व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद
प्रतिनिधी / बेळगाव
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी राज्यातील वीस जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱयांबरोबर शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मुख्यमंत्र्यांकडे बेळगाव जिल्हा अनलॉक करा अशी मागणी त्यांनी केली आहे. कोरोना संदर्भातील आढावा तसेच सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतली आहे.
कोरोनाचे रूग्ण झपाटय़ाने कमी होत आहेत. सध्या बेळगाव जिल्हय़ामध्ये कोरोना नियंत्रणात आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हा अनलॉक करण्यास काहीच हरकत नाही तेक्हा याचा गांभीर्याने विचार करून बेळगाव जिल्हय़ा संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.
सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नदी नाले तुडूंब भरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जिल्हय़ातील कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा या नद्यांना महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडले जाते. त्याबाबत महाराष्ट्राच्या अधिकाऱयांशी तसेच जलसंपदा मंत्र्यांशी आम्ही सतत संपर्कात असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.