ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाविकासआघाडी सरकारची आज महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत एकूण 4 निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेची सदस्य संख्या वाढणार, ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात मान्यता या निर्णयांचा समावेश आहे.