जि.प.अध्यक्ष रोहन बने यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे चर्चा
अनेक पलंबित पश्नांचा निपटारा करण्याचीही मागणी
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ते, इमारत बांधकामांसाठी निधी, अपुरा कर्मचारीवर्ग निपटाऱ्यासाठी जि.प. अध्यक्ष रोहन बने यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना साकडे घातले आहे. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रस्त्यांसाठी 616 कोटी आवश्यक असल्याची मागणी बने यांनी केली आहे. हे पश्न सोडविण्याचे मुश्रीफ यांनी आश्वासन दिल्याने जि. प.च्या प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेतील पलंबित विषयासाठी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांनी थेट मंत्रालयात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. त्या पश्नांबाबत चर्चा केली. निधी तसेच विविध प्रश्नांबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, बांधकाम व अर्थ सभापती महेश म्हाप आदी उपस्थित होते. पलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांच्याशी सकारात्मक चर्चाही झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामध्ये रत्नागिरीला व अधिनस्त पंचायत समितींना सन 2019-20 या वित्तीय वर्षाअखेर सामान्य उपकर, वाढीव उपकर, प्रोत्साहनपर अनुदान, स्थानिक उपकर सापेक्ष अनुदान, माफ केलेल्या जमीन महसूलावरील सामान्य उपकर व माफ केलेल्या जमीन महसूलावरील वाढीव उपकर अशी एकंदरीत रक्कम रू. 704.50 लक्ष रक्कम व पंचायत समितींना रक्कम रू. 1068.70 लक्ष इतकी रक्कम येणे बाकी आहे. रस्ते विशेष दुरूस्ती गट अ, गट-ब, गट -क व गट-ड अंतर्गत दायित्वाच्या कामांकरीता रक्कम रू. 1661.83 लक्ष इतक्या रकमेची आवश्यकता आहे.
जिल्हा परिषद रत्नागिरीकडे इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांची मोठी दुरावस्था झालेली आहे. या मार्गाची एकूण 6749.210 किमी लांबी देखभाल दुरूस्तीसाठी आहे. त्यापैकी खराब झालेल्या डांबरी पृष्ठभागाचे नुतनीकरण करण्यासाठी रक्कम रू. 32525.40 लक्ष व खडीच्या पृष्ठभागाचे डांबरीकरण करणेसाठी रक्कम रू. 29115.31 लक्ष अशी एकूण रक्कम रू. 61640.71 लक्ष इतकी रक्कम मिळणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
ज्याप्रमाणे या पूर्वी जमिन मालकाचे कागदपत्र पडताळणी करुन ग्रामपंचायत घर बांधकामास परवानगी देत होते. त्यानुसारच यापुढेही सर्व अधिकार हे ग्रामपंचायतीलाच देणेत यावेत. जिल्हा परिषद आवारातील लोकनेते शामराव पेजे सांस्कृतिक भवन च्या पहिल्या मजल्यावर मिटींग हॉल बांधणे हे काम प्रगतीत आहे. या कामासाठी सुमारे 75.00 लक्ष (बांधकामासाठी 20.00 लक्ष व अंतर्गत काम/सुशोभिकरणासाठी 55.00 लक्ष) इतक्या रकमेची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात आली आहे.
13 व्या वित्त आयोगातील अखर्चित निधी व 14 व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम अशी एकूण रक्कम 459.22 लक्ष पैकी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानकडे 272.02 इतकी रक्कम परत करण्यात आलेली आहे. परत केलेल्या रकमेमधून जिल्हा परिषद आवारातील लोकनेते शामराव पेजे सांस्कृतिक भवन च्या पहिल्या मजल्यावर मिटींग हॉल बांधणे कामासाठी रक्कम रू. 75.00 लक्ष मागणी करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीकरीता अंदाजित रक्कम रू. 2500.00 लक्ष इतकी रक्कम आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेतील अनेक रिक्त पदांकडे वेधलेय लक्ष
महाराष्ट्र विकास सेवा गट – अ अंतर्गत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रत्नागिरी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं), गट विकास अधिकारी, पंचायत समिती रत्नागिरी व मंडणगड अशी महत्वाची पदे रिक्त आहेत. गट – ब अंतर्गत जिल्हास्तरावरील सहाय्यक गट विकास अधिकारी (ग्रामपंचायत), सहाय्यक प्रकल्प अधिकारी (रोजगार) व पंचायत समिती स्तरावरील सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती लांजा, राजापूर, मंडणगड व खेड अशी महत्वाची पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर वर्ग-3 कर्मचाऱयांची 10731 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 8960 पदे भरलेली असून 1771 पदे (प्रामुख्याने कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)-71, ग्रामसेवक – 134, कनिष्ठ अभियंता-62, आरोग्य सेविका(म)-140, प्राथमिक शिक्षक799 व वाहनचालक-88) रिक्त आहेत. वाहनचालकांची पदे भरण्यास शासनाकडून परवानगी नसल्याने पदे भरता येत नाहीत. वर्ग-4 कर्मचाऱयांची 757 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 453 पदे भरलेली असून 304 पदे रिक्त (परीचर-213, स्त्राr परीचर-30 व सफाई कामगार-37) आहेत.