सातारा / प्रतिनिधी :
मागील काही वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेला अखेरीस त्याला गती मिळाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार जिल्हा परिषदेच्या बदल्या सोमवारी पार पडल्या, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली.
बदली प्रक्रियेत प्रशासकीय बदल्या-10, विनंती बदली-16 व आपसी बदली -6 या प्रकारत करण्यात आल्या आहेत. एकुण 32 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अर्थ विभागात सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), तसेच पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक व कृषी विभागात कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.