कोल्हापूर जिल्हा परिषदेने 14 बियाणे पुरवठाधारकांवर गुन्हे केले दाखल
प्रतिनिधी / कोल्हापूर
खरीप हंगामात बोगस, अप्रमाणीत सोयाबीन बियाणे विक्री प्रकरणी 14 पुरठादारांवर न्यायालायत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
यंदाच्या खरीप हंगामाम शेतकऱयांना प्रमाणीत चांगले दर्जेदार बियाणे देण्यावर कृषी विभागाने भर दिला होता. बोगस बियाणांमुळे शेतकऱयांची फसवणूक होवू नये यासाठी कृषी विभागाने भरारी पथके नियुक्त केली होती. या पथकांकडून बियाणे उत्पादक कंपनी, कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली होती. यावेळी 225 नमुने तपासणीसाठी घेतले होते.
यातील 14 नमुन्यांमध्ये दोष आढळून आले. यामध्ये महाबीज व इगल या दोन कंपन्यांचे आठ तर अन्य 6 कंपन्यांच्या नमुन्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती सतीश पाटील, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम अधिकारी सतीश देशमुख यांनी ही कारवाई केली.