प्रतिनिधी~ सातारा
सातारा- कोरोना महामारी सुरु झाल्यापासून तीन महिने लॉकडाऊन सुरु होता. सर्वकाही बंद असल्याने असं‘य लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. कोरोनापासून बचावासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही हे स्पष्ट झाले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने दि. 17 जुलै ते 26 जुलै असा 10 दिवसांचा लॉकडाऊन पुन्हा ठेवला होता. या लॉकडाऊनचे काटेकोर पालन नागरिकांनी केले. त्यामुळे आता नव्याने सुरु केलेल्या लॉकडाऊनचा फेरविचार जिल्हा प्रशासनाने करावा आणि लॉकडाऊनच्या आधी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत जशी सर्व दुकाने सुरु होती, तशीच शिथिलता या लॉकडाऊनमध्ये द्यावी, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना साथ सुरु झाली तेव्हापासून सातारा जिह्यात सुमारे तीन महिने सर्वकाही बंद होते. यामुळे मोलमजुरी, रोजंदारी करणार्या गोर- गरीब लोकांचे अतोनात हाल झाले. असं‘य लोकांची उपासमार झाली. लॉकडाऊन उठल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे सातारकर नागरिकांसह संपुर्ण जिह्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. वाढती रुग्णसं‘या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा दि. 17 ते 26 जुलै असा 10 दिवसांचा लॉकडाऊन केला. याचे काटेकोर पालन जनतेने केले. प्रशासनाला पुर्ण सहकार्य करणार्या जनतेवर जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन लादला. सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. वेळेची मर्यादा असल्याने गर्दी होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.
कोरोनाला रोखण्याबरोबरच जनजीवन पुर्वपदावर येण्यासाठी सर्व दुकाने सुरु असणे अत्यावश्यक आहे आणि ही काळाची गरज आहे. त्यामुळे बाजारपेठेची, व्यापार्यांची, ग‘ाहकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा ङ्गेरविचार करावा. या लॉकडाऊनमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी वेळेची शिथिलता देवून सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी. तरच नागरिकांना, व्यापार्यांना आणि खास करुन शेतकर्यांना दिलासा मिळेल. गर्दी टाळण्यासाठी आणि जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.