प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जाची सोमवारी रात्री उशीरापर्यंत छाननी सुरु होत़ी बॅकेच्या निवडणुकीत उमेदवारांनी छाननीमध्येच एकमेकांच्या अर्जातील त्रुटींचा आधार घेवून आक्षेप नोंदवले होत़े सहकार पॅनल विरोधात पंधरा जागांवर अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस वाढली असल्याचे दिसून येत आह़े
याआधीच 6 मतदारसंघामध्ये विरोधी अर्ज दाखल न झाल्यामुळे 6 संचालक बिनविरोध झाले आहेत़ सोमवारी सकाळी उमेदवार अर्जाची छाननी प्रक्रिया सुरु झाल़ी सर्वपक्षीय सहकार पॅनलमधील 15 उमेदवारांविरोधात अर्ज दाखल करण्यात आले आहेत़ त्यातील बहुतांश उमेदवारांनी परस्परविरोधात आक्षेप नोंदवत निवडणुकीपूर्वीच एकमेकाला अपात्र करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आह़े दाखल करण्यात आलेल्या उमेदवाराचे सूचक थकबाकीदार तसेच सहकार क्षेत्रातील अनुभव नाही, असे आक्षेप घेण्यात आले आहेत़ निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांच्याकडे सकाळपासून सुनावणी प्रक्रिया सुरु झाल़ी हरकती नोंदवण्यात आल्यात दुपारी 3 वाजेपर्यंत छाननी करण्यात येणार होत़ी मात्र हरकतींची संख्या जास्त असल्यामुळे रात्री उशीरा पर्यंत सुनावणी चालू होत़ी त्यामुळे 15 जागांसाठी किती उमेदवार पात्र व अपात्र ठरले हे समजू शकले नाह़ी
मोठय़ा प्रमाणात आक्षेप-हरकती दाखल झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सोमवारी उमेदवारांची रात्री मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होत़ी यावेळी बॅकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, मधुकर टिळेकर, अमजद बोरकर, ऍड. दीपक पटवर्धन, सचिन बाईत, चंद्रकांत बाईत आपल्या उमेदवार व समर्थकांसह उपस्थित होत़े