प्रतिनिधी/ रत्नागिरी
तत्कालीन सिव्हील सर्जन यांनी 3 महिने होत आले तरी अद्यापही शासकीय निवासस्थान सोडले नाही. इतकेच नव्हे तर या निवासस्थानाची चावी कोणत्याही नातेवाईकांना पर्यटन वारीसाठी दिली जाते. त्यामुळे ही चावी बांधकाम विभागाने ताब्यात घेवून योग्य ती कार्यवाही करावी किंवा कुलूप तोडून निवासस्थानाचा ताबा घ्यावा, असे पत्र बांधकाम विभागाला सिव्हील सर्जन डॉ. संघमित्रा फुले यांनी दिले आहे.
डॉ. बोल्डे यांची बदली होवून 2 महिने होवून गेले तरी अद्यापही शासकीय निवासस्थानची चावी सिव्हील प्रशासनाकडे जमा केलेली नाही. मुळात बदली होवून गेल्यापासून एकदाही रत्नागिरीत आलेले नाही, मात्र अद्यापही निवासस्थान का सोडले नाही, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ही चावी कोणत्याही नातेवाईकांना दिली जाते. त्यामुळे पर्यटनासाठी निवासस्थानाचा वापर केला जातो का, अशी चर्चा केली जात आहे. त्यामुळे हे निवासस्थान ताब्यात घ्यावा अन्यथा कुलूप तोडावे, असे पत्र बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. याविषयी जिल्हाधिकारी यांच्याशी सिव्हील सर्जन डॉ. संघमित्रा फुले यांनी चर्चा केली असता वेळ पडल्यास कुलूप तोडून निवासस्थान ताब्यात घेवूया, असे त्यांनी सांगितले.