सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून, 18 जणांचा मृत्यू, 24 जण बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 1324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आलेले असून, एनडीआरएफएक टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
जिल्ह्यातील एकूण 167 गावे पुर्णत: व 212 गावे अंशत: अशी एकूण 379 गावे बाधित झोलली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील 44 गावे पुर्णत: व 7 गावे अंशत: अशी एकूण 51 गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण 30 गावे अशत: बाधित झालेली आहेत. पाटण तालुक्यातील 10 गावे पुर्णत: व 60 गावे अंशत: अशी एकूण 70 गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावे पुर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील 13 गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील 102 गावे अशत: बाधित झाली आहेत.
जिल्ह्यात एनडीआरएफच्या 3 टीम कार्यरत असून, एका टिमची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याचेही सिंह यांनी सांगितले.