प्रतिनिधी / रत्नागिरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायांकडून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. कोरोना संकमणाच्या पार्श्वभूमीवर जिह्यामध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन यावेळी सर्वत्र होताना दिसले. रत्नागिरी शहरात जिल्हा शासकीय रूग्णालयासमोरील पुतळ्याजवळ बाबासाहेबांच्या पुतळ्याला विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण केले.
प्रतिवर्षी 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी विविध ठिकाणी दिसून येते. मात्र, यावर्षी कोरोना संक्रमण होण्याची शक्यता असल्याने कुठेही गर्दी दिसली नाही. गावच्या ठिकाणी मोजक्याच लोकांनी एकत्र येत विहारात बौद्धपूजा पाठ घेण्यात आला. तालुक्याच्या ठिकाणी विविध संघटनांनी मोजक्याच कार्यकत्यांनी एकत्र येत बाबासाहेबांना अभिवादन केले. तसेच काँगेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. विजयराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँगेस भवन रत्नागिरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी दीपक राऊत, कपिल नागवेकर, अश्विनी आगाशे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल माहिती विषद केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी महिला प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत, महिला जिल्हाध्यक्षा अॅड. अश्विनी आगाशे, सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर काद्री, सोशल मिडिया जिल्हाप्रमुख कपिल नागवेकर, जिल्हा उपाध्यक्ष बरकत काझी, सरचिटणीस दीपक राऊत, तालुका समन्वयक सचिन मालवणकर, महिला तालुका चिटणीस सुस्मीता सुर्वे, महिला शहर अध्यक्ष रिझवाना शेख, क्रांती मोझेस, रवी खेडेकर, अनंत शिंदे, अल्मास मोगल, तेजश्री गोतम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.