अचूक बातमी “तरूण भारत”ची, रविवार 27 मार्च 2022, सकाळी 11.00
● 14 मार्च, 24 मार्च व 27 मार्चला जिल्ह्यात शून्य बाधित
● लसीकरणावर भर
● 485 जणांची स्वॅब तपासणी
● पॉझिटिव्हिटी 0.0
सातारा / प्रतिनिधी :
दोन वर्षापूर्वी जिल्ह्यात आलेले कोरोना रुपी संकट आता हद्दपार होत आहे. मार्च महिन्यात तीन वेळा निरंक बाधित आढळून आले आहेत. दि.14 रोजी शून्य बाधित होते. त्यानंतर दि.24 व दि.27 रोजी जाहीर झालेल्या अहवालात शून्य बाधित आहेत. जिल्ह्यातील 485 जणांची स्वॅब शनिवारी तपासणी करण्यात आले असून, पॉझिटिव्हिटी 0.0 एवढी आहे.
एका महिन्यात तिसऱ्यांदा नव्याने बाधित वाढ शून्यावर
जसा जानेवारी महिना धोकादायक वाटत होता, तसा मार्च महिना हा जिल्हावासीयांच्या दृष्टीने दिलासा देणारा असा ठरला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेला 15 जण बाधित आढळून आले होते तर 1 हजार 6 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर नव्याने होणारी बाधित वाढ कमी कमी होत राहिली. एका आठवड्यानंतर दि.8 मार्चला केवळ एक जण बाधित आढळून आला तर स्वॅब तपासणी 806 जणांचे करण्यात आले. त्यानंतर दि.14 रोजी जिल्ह्यात एक ही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. स्वाब तपासणी 369 जणांची करण्यात आली. दि.24 मार्च रोजी ही एकही बाधित आढळून आला नव्हता.637 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले होती. जिल्हा दोन वर्षांनंतर कोरोना मुक्त झाला. त्यानंतर दि.27 रोजी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. गेल्या 26 दिवसात 18 हजार 508 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आली तर नव्याने जिल्ह्यात 171 जण बाधित आढळून आले. जिल्ह्याचे वातावरण आता चांगले असून एका महिन्यात तीन वेळा कोरोना हद्दपार करण्यात आला आहे.
कोरोना मुक्तीचा दर चांगला
जिल्ह्यात नव्याने बाधित आढळून येणारे रुग्ण हे कमी प्रमाणात असून त्यांच्यावर आरोग्य यंत्रणा चांगले उपचार केले जात आहेत. त्यामुळे कोरोना मुक्तीचा वेग चांगला आहे. आतापर्यंत कोरोना मुक्त झालेले 2 लाख 71 हजार 789 जण आहेत.
रविवारी
नमुने-485
बाधित-00
रविवारपर्यंत
नमुने-25,70,453
बाधित-2,79,192
मृत्यू-6,683
मुक्त-2,71,789