अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 21 मार्च 2022, सकाळी 11.00
● कराड तालुक्यात 7
● सातारा तालुक्यात 1
● 393 जणांची स्वॅब तपासणी
● पॉझिटिव्हीटी 2.04
● रिकव्हरी रेट 97.34
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित आढळून येण्याचे प्रमाण पूर्णपणे नियंत्रणात आले आहे. जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. नव्याने आढळून येणारे बाधित दहाच्या आत असून, सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात केवळ आठ जण नव्याने बाधित आढळून आले. त्यामध्ये कराड तालुक्यात 7 तर सातारा तालुक्यात 1 बाधित असे जिल्ह्यात नव्याने 8 बाधित आढळून आले आहेत तर रविवारी दिवसभरात 393 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. पॉझिटिव्हिटी 2.04 एवढी आहे.
नऊ तालुके निरंक
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे नव्याने बाधित आढळून येण्याचे प्रमाण घटत राहिल्याने 15 मार्चला जिल्हा कोरोनामुक्त झाला. तेव्हापासून नव्याने बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या दहाच्या खाली आहे. बहुतांशी अकराच्या अकरा तालुके कोरोनामुक्त ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामध्ये काल रविवारी कराड आणि सातारा या दोन तालुक्यात नव्याने बाधित आढळून आले आहेत. आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील 9 तालुके निरंक आहेत. एकही रुग्ण आढळून आलेला नाही. असे दिलासादायक चांगले चित्र आहे.
रिकव्हरी रेट चांगला
जिल्ह्यामध्ये नव्याने जे रुग्ण बाधित आढळून येत आहेत. त्यांच्यावर चांगले उपचार करून बरे केले जात आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे केवळ तीन जण कालपर्यंत होते. रिकव्हरी 97.30 रेट एवढा आहे.
सोमवारी
नमुने-393
बाधित-8
सोमवारपर्यंत
नमुने-25,67,004
बाधित-2,79,176
मृत्यू-6683
मुक्त-2,71,754