प्रतिनिधी / रत्नागिरी
काल सायंकाळपासून प्राप्त अहवालांमध्ये ३ अहवाल पॉझिटिव्ह आले असून ४६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
३ जून रोजी कामथे येथे मृत झालेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा १४ वर गेला आहे. आज प्राप्त झालेले दोन पॉझिटिव्ह अहवाल अनुक्रमे रत्नागिरी १ आणि संगमेश्वर १ येथील आहेत. तर आज कोरोनावर मात केलेल्या ६ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३६४
बरे झालेले रुग्ण १७३
उपचारात १७७
मृत झालेले १४