अचूक बातमी “तरूण भारत”ची, रविवार 20 फेब्रुवारी 2022, सकाळी 11.00
● जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 3.65 वर
● शनिवारी 1371 जणांची स्वॅब तपासणी
● कोरोना मृत्युदर रोखण्यात यश
● वाई तालुक्यातील नव्याने केवळ 1 जण बाधित
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील बाधित वाढ रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. तसेच मृत्युदर रोखण्यात यश आले आहे. रविवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात नव्याने 50 जण बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 3.65 वर आलेला आहे. सर्वच तालुक्यातील दहाच्या आतमध्ये बाधित वाढ आहे. वाई तालुक्यात 1 जण बाधित आढळून आला आहे.
जिल्ह्यात नव्याने 50 जण बाधित
जिल्ह्यातील सर्वच तालुके कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. बहुतांशी सर्वच तालुक्यातील आरोग्य यंत्रणा मेहनत घेऊन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. रविवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात सातारा जिल्ह्यातील 1371 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले तर 50 जण बाधित आढळून आले यामध्ये सातारा तालुक्यातील 10,कराड तालुक्यातील 9, फलटण तालुक्यातील 7, कोरेगाव तालुक्यातील 6, खटाव तालुक्यातील 5, खंडाळा तालुक्यातील 3, माण तालुक्यातील 3, पाटण तालुक्यातील 3, वाई तालुक्यातील 1, असे सातारा जिल्ह्यातील 47 तर इतर 3 असे 50 जण बाधित आढळून आले आहेत.
मृत्युदर रोखण्यात यश
सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्यास यश आले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मृत्यू दर हा शुन्याच्या खाली आलेला आहे. आरोग्य यंत्रणा व प्रशासन आणि जिल्ह्यातील नागरिकांच्यामुळे हे यश आले आहे. कोरोनातून झालेले बरे झालेल्यांची संख्या मोठी आहे.
रविवारी
नमुने-1371
बाधित-50
रविवारपर्यंत
नमुने-26,42,248
बाधित-2,78,883
मृत्यू-6,669
मुक्त-2,71,094