प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचे विघ्न कमी होण्यास गणेशोत्सवापासून सुरूवात झाल्याचे दिसू लागले आहे. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात 231 नवे रूग्ण आढळले आहेत. यात सर्व तालुक्यांमध्ये संसर्ग कमी झाल्याचे दिसत असून दोन आकडी रूग्णांची नोंद झाली आहे. हॉटस्पॉट असणारे सातारा आणि फलटणमध्ये वाढ नियंत्रणात आल्याची दिलासादायक स्थिती आहे. दरम्यान, 3 बाधितांचा मृत्यू झाला असून 64 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
साताऱयात 58 रूग्ण
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 231 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. यात सर्वाधिक 59 रूग्ण सातारा तालुक्यात आढळले आहेत. तर फलटणमध्ये 45 रूग्ण नोंद झाले आहेत. दुसऱया लाटेत 231 रूग्ण ही स्थिती गेल्या चार ते पाच महिन्यातील निच्चांकी आहे.
जिल्हय़ातील सर्व तालुक्यांमध्ये रोज नोंद होणारी रूग्णसंख्या शंभरच्या आत आली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. जावली 6 (9914), कराड 24 (38526), खंडाळा 8 (13988), खटाव 46 (24998), कोरेगाव 10 (21507), माण 21 (17379), महाबळेश्वर 0 (4636), पाटण 5 (10128), फलटण 45 (36109), सातारा 59 (50442), वाई 7 (15594) व इतर 0 (2009) असे आजअखेर एकूण 245230 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.
तीन बाधितांचा मृत्यू
गेल्या चोवीस तासात तीन बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या कराड 1, खटाव 1, व फलटण 1 अशी एकूण 3 असून आजअखेर जिह्यामध्ये एकूण 6022 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
64 जणांना डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 64 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
दोन अपवाद वगळता रूग्णवाढ पाचशेच्या खाली
जिह्यात मे, जून, जुलै महिन्यात रूग्णवाढीचा वेग धक्कादायक होता. दोन दिवसाला सुमारे तीन ते पाच हजारांची वाढ होत होती. या वाढीने जिल्हा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. सप्टेंबर महिन्यात फक्त 2 सप्टेंबरला 560 व 4 सप्टेंबरला 540 रूग्णवाढ वगळता इतर 13 दिवसात रूग्णवाढ पाचशेच्या खाली आली आहे.
बेफिकीरी वाढली
संसर्ग कमी होऊ लागल्याने लोकांमध्ये बेफिकीरी वाढली असून मास्क नाकावरून गळय़ात आल्याचे दिसत आहे. दुसरी लाट ओसरत असताना तिसऱया लाटेला थोपवणे जिल्हावासियांच्या हातात असून सोशल डिस्टन्स, मास्कसह निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे.