बेळगाव तालुक्मयात तब्बल 42 तलावांच्या कामांना गती : यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडल्यास शेतकऱयांना होणार फायदा
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांतील अनेक गावांमध्ये रोजगार हमी योजनेतून तलाव खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना रोजगार मिळत आहे. हे काम मागील काही वर्षांपासून सुरू असले तरी मागील दोन वर्षांपासून याला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. इतके काम झाले असले तरी नागरिकांना अजूनही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे. मार्च ते एप्रिल महिन्यात सर्वच तलावांतील पाणी आटत असल्याने उद्योग खात्री योजनेतून पुन्हा एकदा तलावांचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.
उद्योग खात्री योजनेतून अनेक तलावांची खोदाई करण्यात आली आहे. मात्र, योग्य नियोजन नसल्यामुळे पाणीसाठा होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तलावात पाणी साठत नसेल तर तलाव खोदाई करण्याचे कारणच काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. सध्या जमिनीतील पाणी पातळीत मोठय़ा प्रमाणात घट झाली असून यापुढे तरी कालवा अथवा इतर मार्गाने पाणी तलावात साठवून पाण्याचा उपयोग नागरिकांना व्हावा, यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्मयात ही योजना यशस्वी राबविण्यात आली असली तरी इतर तालुक्मयांमध्ये मात्र याचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता जिल्हय़ात सर्व ठिकाणी तलाव खोदाईचे काम हाती घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
मागील दोन वर्षे पडलेल्या पावसामुळे यावषी काही प्रमाणात पाणी समस्या उद्भवणार नाही, हे खरे असले तरी जर पाऊस कमी झाला तर काय करायचे? हा सवाल अंतर्मुख करणारा आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये सध्या विविध योजनांमधून तलावांच्या खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. बेळगाव तालुक्मयात तब्बल 42 तलावांच्या कामांना गती देण्यात आली आहे. मात्र, इतर तालुक्मयांत याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तलावांच्या कामांमुळे अनेक गावांमधील नागरिकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.
मोठय़ा प्रमाणात पाऊस नसल्यामुळे तलावात पाणीसाठा होत नाही. यातच पाणी पातळी वाढली तर तलावांमध्ये पाणीसाठा टिकून राहणार आहे. त्यासाठी आता तलावांची अधिक खोदाई करून पाणीसाठा अधिक प्रमाणात राहील, यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. जिल्हय़ामध्ये असणारे तलाव शेतकरी व नागरिकांसाठी अतिशय लाभदायक ठरतात. या तलावांत पावसाळय़ात पाणी सोडण्यासाठी कालवा किंवा इतर पर्यायांचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाळय़ामध्ये तलाव तुडुंब भरले की आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱयांना पिकांना पाणी देण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी तलावांचा चांगला उपयोग होतो. बेळगाव जिल्हय़ातील सर्रास गावांमध्ये तलाव आहेत. मात्र, यापैकी सर्रास तलावांमध्ये यावर्षी पाण्याचा साठा बऱयापैकी झाला असला तरी पाणी मात्र लवकरच कमी झाले आहे. नागरिकांना कोरडय़ा पडलेल्या तलावांमुळे दूरवरून पाणी आणून पिकांना व जनावरांना पाजावे लागत आहे. सध्या शेतकऱयाला वळिवाची ओढ लागली असली तरी यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडल्यास शेतकऱयांना त्याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
काही ठिकाणी योग्यप्रकारे काम होत नसल्याच्या तक्रारी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून तलाव खोदाईचे काम हाती घेतले जात आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत काही ठिकाणी योग्यप्रकारे काम होत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. यावर्षी तलाव खोदाईमुळे मान्सून जोराचा झाल्यास तलाव तुडुंब भरणार आहेत.