प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचे रुग्ण ज्या तालुक्मयांमध्ये जास्त आढळले आहेत. तसेच कोरोनामुळे मृत्यू अधिक झाल्यामुळे पाच तालुक्मयांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱयांकडून माहिती घेतली. त्यामध्ये संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले होते. मात्र पाच तालुके लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आता लॉकडाऊनचा आदेश जारी करण्यात आला.
मंगळवारी रात्री 8 वाजल्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. बुधवार दि. 22 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. 7 दिवसांचे कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. यामध्ये गोकाक, मुडलगी, अथणी, कागवाड यासह निपाणी तालुक्मयाचा समावेश आहे. दूध, औषधे वगळता इतर कोणीतीही दुकाने या काळात उघडी ठेवू नये असे सांगण्यात आले आहे. जनतेने लॉकडाऊन काळात सहकार्य करणे गरजेचे आहे. कारण कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. तेव्हा प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. दिलेल्या नियमांचे पालन करत सर्वांनी लॉकडाऊन पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी केले आहे. या सर्व तालुक्मयांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सीमाभागामध्ये हे तालुके वसले आहेत. या तालुक्मयांचा संपर्क महाराष्ट्राशी अधिक आहे. गोकाक तालुका वगळता इतर तालुक्मयांचा संपर्क अधिक असल्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यासाठीच हे लॉकडाऊन करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.