वादळाच्या शक्यतने नौका किनाऱयावर : परराज्यातील नौकांनीही टाकले नांगर : पाण्याला मोठय़ा प्रमाणात ‘करंट’ : बंदरातील कोटय़वधीची उलाढाल ठप्प
प्रतिनिधी / रत्नागिरी
समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे जिह्याच्या किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती असून समुद्र खवळला आह़े समुद्रामधील वादळसदृश परिस्थितीमुळे परराज्यातील नौकांसह स्थानिक नौका बंदरावर नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत़ यामुळे मच्छीविक्रीतून होणारी कोटय़वधीची उलाढाल ठप्प झाली असून याचा फटका दापोली-हर्णे, राजापूर-नाटेसह गुहागर किनाऱयालाही बसला आहे.
जिह्यात बुधवारी हवामान खात्याने अंबर अलर्ट दिला आह़े या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी नौका किनाऱयावर नांगरुन ठेवल्या आहेत़ समुद्रातील पाण्याला ‘करंट’ असल्याचेही मच्छीमारांनी सांगितल़े समुद्रामध्ये वादळी-वारे वाहत आहेत़ ऐन हंगामात या खराब वातावरणाचा फटका मासेमारीला बसला आह़े सतत बदलत्या वातावरणामुळे स्थानिक मच्छीमारी पुरती कोलमडली आह़े गेल्या 2-3 दिवसापासून किनारपट्टीवर अधूनमधून जोराच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. खोल समुदात वादळसदृश स्थिती व हवामान खराब झाल्यामुळे स्थानिक मच्छीमारांसह परराज्यातील मच्छीमारी नौका आश्रयासाठी येथील जयगड, तवसाळ बंदरात दाखल झाल्या आहेत़ यात गुजरातमधील 50 ते 100 नौका असल्याची माहिती मच्छीमारांनी दिली. वादळसदृश परिस्थिती अजून काही दिवस राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रामध्ये जाण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे
मासळीची उलाढाल मंदावली
खराब हवामानामुळे मच्छीमारी पूर्णतः थंडावली आह़े वादळी वाऱयामुळे छोटय़ा नौकाधारकांनी समुद्रात जाणे टाळले आह़े त्यामुळे बाजारामधील मासळीची उलाढाल मंदावल्याचे चित्र आह़े मासळी कमी झाल्याने मासळीचे दरही वधारले आहेत़
मच्छीमारी पूर्णतः ठप्प
वादळाच्या परिस्थितीमुळे नौका बंदरानजीक उभ्या आहेत़ वेगवाग वारे व पाण्याला करंट असल्यामुळे काही नौकांची जाळी तुटली आहेत़ मच्छीमारी पुन्हा एकदा पूर्णतः ठप्प झाली आह़े
आप्पा वांदरकर, : मच्छीमार, रत्नागिरी
आंजर्ले, मुरूड, जयगड, दाभोळ खाडीकिनारी आश्रय
मौजे दापोलीः वादळी वारे व जोरदार पावसामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका पुन्हा जवळच्या खाडीभागात आल्या आहेत. यामुळे गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हर्णै येथील मच्छीमारांनी मासेमारी बंद ठेवली आहे. वादळी वाऱयामुळे आपल्या नौकांनी आंजर्ले, रायगड जिल्हय़ातील मुरूड, जयगड, दाभोळ अशा खाडय़ांमध्ये आश्रय घेतल्याचे मच्छीमार महेंद्र चोगले यांनी सांगितले.
ऑगस्टपासून मासेमारीला सुरूवात होते. असे असले तरी मच्छीमारांवर फार मासेमारी करण्याची मुभा यावर्षी निसर्गाने दिलेली नाही. त्यामुळे किनाऱयालगतच मासेमारीचा प्रयत्न अनेक मच्छीमार करत आहेत. चार दिवसांपूर्वी हर्णै येथील काही नौका मासेमारीसाठी गेल्या होत्या. परंतु वादळी वाऱयांसह पावसाचा हवामान खात्याने इशारा दिल्यामुळे नौका किनाऱयाला आणण्यात आल्या. कोरोना संकट असले तरी मासेमारीसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे मच्छीमारांनी आपल्या नौका समुद्रात लोटल्याही होत्या. परंतु काही अंतरावर गेल्यानंतर हवामान खात्याकडून पाऊस, वादळाचे संकेत दिले जात होते. त्यामुळे पुन्हा नौका किनाऱयांवर आणाव्या लागत होत्या. हे सत्र आता जवळपास 2 महिने सुरूच असल्याचे हर्णैतील मच्छीमारांनी सांगितले. 4 दिवसांपूर्वी मासेमारीसाठी गेलेल्या नौका किनाऱयावर आणल्यानंतर पुन्हा पाऊस व वादळाची शक्यता वर्तवण्यात आल्याने अजून 2 ते 4 दिवस नौका किनाऱयालाच राहणार आहेत. त्यामुळे मच्छीमारांवर निसर्गाने जणू संक्रांत आणल्याचे हर्णै पंचक्रोशीतून बोलले जात आहे. मासळी अधिक मिळत नसल्यामुळे मच्छीचे दरही वाढत आहेत.
नाटे बंदरातील कोटय़वधीची उलाढाल ठप्प
राजापूरः सोसाटय़ाचा वारा व मुसळधार पावसामुळे समुद्राला आलेले उधाण, उसळणाऱया अजस्त्र लाटा यामुळे मागील 3-4 दिवसांपासून राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदरातील मच्छीमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. मच्छीविक्रीतून होणारी कोटय़वधीची उलाढाल ठप्प झाली आहे.
जवळपास 5 हजार लोकसंख्या असलेल्या राजापूर किनारपट्टीवर साखरीनाटे बंदरात दरदिवशी मच्छीमारीमधून लाखोंची उलाढाल होते. साखरीनाटे बंदरात यांत्रिकी, बिगर यांत्रिकी, पर्ससीन अशा जवळपास 200 मच्छीमार बोटी आहेत. या बोटींवर काम करण्यासाठी परराज्यातून मोठय़ा संख्येने कामगार येत असतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप परराज्यातील कामगार आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे आधीच मच्छीमारी करणाऱया व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता. अशातच मागील काही दिवसांपासून सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मच्छीमारांसाठी रेड ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मागील 3 ते 4 दिवसांपासून साखरीनाटे बंदरातील मच्छीमारी बोटी बंदरात विसावल्या आहेत. 3 दिवसांपासून मच्छीमारी ठप्प असल्याने कोटय़वधीची उलाढाल थांबली आहे.त्यामुळे मच्छीमारांसह विक्रेते तसेच या व्यवसायांवर अवलंबून असणाऱयांचे आर्थिक नुकसान झाले. 23 सप्टेंबरपर्यंत धोक्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे समुद्र शांत झाल्यास येत्या 2 दिवसांत मच्छीमारी सुरू होईल, अशी शक्यता मच्छीमारांमधून वर्तवण्यात येत आहे.