महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा परिषदेकडून गेल्या काही महिन्यापासून शिक्षकांचे वेतन उशिरा होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने इयत्ता पहिलीपासून सर्वच शाळा सुरू करा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे, 2014 साली विषय शिक्षक स्विकारलेल्या शिक्षकांना लेखी संरक्षण द्यावे. रिक्त जागेवर विषय शिक्षकांना प्रमोशनवर घ्यावे. प्रलंबित वैद्यकीय बिले निर्गत व्हावीत. कोरोना कालावधीत ऑनलाईन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने पाचवीपासून पुढचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतू शाळा सुरू करण्याचे अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हय़ातील पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू करावेत. यावेळी प्रमोद तौंदकर, प्रमोद भांदिगरे आदी उपस्थित होते.