मार्च 2022 पर्यंत सर्व 741 गावे करणार ओडीएफ प्लस – जि. प. अध्यक्षांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
महात्मा गांधी जयंती व स्वच्छ भारत दिवस यांचे औचित्य साधून जिल्हय़ातील 74 महसूल गावांनी हागणदारी मुक्त अधिक (ओडीएफ प्लस) दर्जा संपादन केला आहे. यापूर्वी 41 गावे ‘ओडीएफ प्लस’ झाली होती. त्यामुळे आतापर्यंत 115 गावे ओडीएफ प्लस झाली असल्याचे जि. प. अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. मार्च 2022 पर्यंत सर्व 741 महसुली गावे ओडीएफ प्लस करणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जि. प. अध्यक्षांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, पाणी व स्वछता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर उपस्थित होते.
यापूर्वी पहिल्या टप्प्यात ‘ओडीएफ प्लस’ झालेल्या गावांमध्ये कुडाळ तालुक्मयातील 27, सावंतवाडी 15, देवगड 10, दोडामार्ग चार, वेंगुर्ले तीन, मालवण पाच, कणकवली आठ, तर वैभववाडी तालुक्यातील दोन महसूल गावांचा समावेश आहे. 15 ऑगस्ट रोजी जिल्हय़ातील 41 महसूल गाव हागणदारी मुक्त अधिक म्हणजेच ओडीएफ प्लस जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता 74 गावे ओडीएफ प्लस झाली आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ातील 741 महसूल गावांपैकी 115 गावांनी ‘ओडीएफ प्लस’ दर्जा प्राप्त केला आहे.
जिल्हा हागणदारी मुक्त झाल्यानंतर जिल्हय़ाची वाटचाल ओडीएफ प्लसकडे सुरू झाली होती. हागणदारी मुक्त गाव संकल्पनेत गावातील कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सर्व निकष पूर्ण असणे गरजेचे आहे. सदर निकष पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामसभा किंवा मासिक सभेचा ठराव घेऊन गाव ओडीएफ प्लस जाहीर करण्यात येते. महात्मा गांधी जयंती व स्वच्छ भारत दिवस यांचे औचित्य साधून जिल्हय़ातील 74 गावे ओडीएफ प्लस म्हणून घोषित करण्यात आली. यामध्ये देवगड तालुक्मयातील – गवाणे, वाघिवरे, धोपटेवाडी, तळवडे, बापर्डे, जुवेश्वर, गिर्ये, वानिवडे, पाटगाव, हिंदळे. वैभववाडी तालुक्मयातील – ऐनारी, कुंभवडे. कणकवली तालुक्मयातील – पियाळी, तळेरे, शिवडाव, शिरवल, करंजे, नवी कुर्ली, लोरे नं. 1, ओझरम. मालवण तालुक्मयातील – असगणी, रामगड, गोठणे, बुधवळे, कुडोपी. कुडाळ तालुक्मयातील – किनळोस, गवळगाव, घाडीगाव, सोनवडे, दुर्गनगर, नमसगाव, बेनगाव, गिरगाव, नमसपूर, आंबडगाव, गांधीग्राम, चेंदवण, कांडरगाव, साईगाव, कविलगाव, मिटक्मयाचीवाडी, बेलनदी, रुमडगाव, कुसबे, मुळदे, वालावल, मुड्डय़ाचाकोंड, बांबुळी, वाडोस, मुणगी, खोचरेवाडी, टेंबेगाव. वेंगुर्ले तालुक्मयातील – कर्ली, गयाण, परुळेबाजार. दोडामार्ग तालुक्मयातील – मोर्ले, पाटय़े पुनर्वसन, सासोली खुर्द, आडाळी, कोलझर. सावंतवाडी तालुक्मयातील – कोनशी, गाळेल, डोंगरपाल, भालावल, डिंगणे, गेळे, पडवे माजगाव, पारपोली, रोणापाल, साटेली त. सातार्डा, तांबोळी, कवठणी, किनळे, पाडलोस, वेत्ये.
सध्यस्थित जिल्हय़ातीला 115 महसूल गावांनी गाव हागणदारी मुक्त (ओडीएफ प्लस) दर्जा प्राप्त केला असून कुडाळ 36, सावंतवाडी 18, देवगड 14, दोडामार्ग नऊ, वेंगुर्ले चार, मालवण सहा, कणकवली 18, वैभववाडी दहा अशा महसूल गावांचा समावेश आहे. मार्च 2022 पर्यंत सर्व 741 महसुली गावे ओडीएफ प्लस करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
गावे ओडीएफ प्लस होण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. त्यासाठी शोषखड्डे खोदणे आवश्यक आहे. नोव्हेंबरपर्यंत 40 हजार शोषखड्डे खोदणार, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली.
आतापर्यंत नऊ हजार वोटिंग, दीड लाखाचे उद्दिष्ट
स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेंतर्गत आतापर्यंत नऊ हजार लोकांनी स्वच्छता ऍपवर प्रतिक्रिया नोंदविली आहे. 20 ऑक्टोबरपर्यंत दीड लाख प्रतिक्रिया नोंदविण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्हय़ातील सर्व लोकांनी स्वच्छता ऍपवर प्रतिक्रिया नोंदवावी, असे आवाहन जि. प. अध्यक्षांनी केले आहे.