खते, बियाणांची खरेदी सुरू करण्याचेही आवाहन
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात संचारबंदी शिथील झाली नसली तरी महत्वाची कामे सुरू करण्यासाठी जिल्हय़ातील स्थापत्य स्वरुपाच्या 182 विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. तसेच जिल्हय़ातील शेतकऱयांनी खते व बियाणांची खरेदी सुरू करावी, असे आवाहन केले आहे तर दस्त नोंदणी 3 मे पर्यंत बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात 20 एप्रिलनंतर संचारबंदी काही प्रमाणात शिथील होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने 3 मे पर्यंत संचारबंदीमध्ये कोणतीही शिथिलता करण्यात आलेली नाही. मात्र, पावसाळय़ापूर्वी काही महत्वाची कामे होणे आवश्यक आहेत. यासाठी महत्वाच्या कामांनाच मंजुरी देण्यात येत आहे. त्याप्रमाणे स्थापत्य स्वरुपाच्या 182 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये रस्ते, साकव, पूल, शाळांचे बांधकाम, मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पत्तन विभागाकडील बांधकामे या विकासकामांचा समावेश आहे.
शेतकऱयांनी खते व बियाणांची खरेदी सुरू करावी
खरिप हंगामासाठी बियाणे व खते जिल्हय़ात उपलब्ध झाली असून शेतकऱयांनी आतापासूनच खते व बियाणांची खरेदी सुरू करावी. ही खरेदी करताना शेतकऱयांनी शारीरिक अंतराचे (सोशलडिस्टन्स) पालन करावे व गर्दी करू नये. शेतकऱयांनी आतापासूनच खरेदी सुरू केल्यास उपलब्धतेच्याबाबत काही कमतरता जाणवल्यास ती लागलीच दूर करता येईल व पुरवठय़ामध्ये सुटसुटीतपणा आणता येईल. तसेच केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी सोपी होईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दस्त नोंदणी 3 मे पर्यंत बंद राहणार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हय़ातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी कामकाज 3 मे 2020 रोजी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. यापूर्वी सदर दस्तनोंदणी 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, जिल्हय़ातील कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्मयता लक्षात घेता आता सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी 3 मे 2020 रोजीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.