प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रवादी काँग्रेसकडे पैसे आहेत म्हणून बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींचे पैसे देवून सत्कार करतात. परंतु आम्ही गुलाब फुल देवून स्वागत करतो, अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर केली. दरम्यान, राज्य सरकारने सुरक्षा काढल्याच्या प्रश्नांवर त्यांनी फडणवीस, पाटील यांना संरक्षणाची गरज नाही. कार्यकर्त्यांचे बळ हेच त्यांची सुरक्षा आहे, अशी टीप्पणी राज्य सरकारवर करत ग्रामपंचायतींमध्ये भाजपा ताकदीने उतरली आहे. सुमारे 300 ग्रामपंचायतीवर भाजपा निवडून येईल, असा दावा त्यांनी केला.
सातारा दौऱयावर खासदार गिरीश बापट हे आले असताना त्यांनी सुरुवातीला खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात ग्रामपंचयात निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, युव<ा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीलेश नलावडे, ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताजी थोरात यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना खासदार गिरीश बापट म्हणाले, सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किंवा त्यांची पक्कड वगैरे मला मान्य नाही. पण निवडणुकीत आम्ही ताकदीने उतरलो आहे, असे सांगत ते म्हणाले, सातारा जिह्याची थोडक्यात माहिती घेतली आहे मी. जिह्यात 1454 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 876 ग्रामपंचायतींच्या निवडण्gtका आहेत. त्यातल्या 555 ठिकाणी भाजपाने आपलं पॅनेल उभं केलेल आहे. एकूण सदस्य संख्या 6 हजार 100 एवढय़ाकरता निवडणूक होत आहे. भाजापचे 3 हजार कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यात 166 ग्रामपंचायती बिनविरोध 68 ठिकाणी भाजपाच्या ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.
ग्रामपातळीवर पक्षीय पातळीवर निवडणुका लढवल्या जात नाहीत. 66 ठिकाणी भाजपाच्या निवडणुका लढवल्या गेल्या आहेत. साधारणपणे 2500 भाजपाचे सदस्य निवडून येतील, असा आमचा अंदाज आहे. भाजपा देश पातळीवरुन ग्रामपंचायतीकरता कृषी विभागामार्फत असेल, ग्रामविकास खात्यामार्फत असेल, ज्या योजना राबवत आहे. त्याला खूप मोठा प्रतिसाद आहे. थेट केंद्राचे पैसे ग्रामपंचायतीला देण्यात येतात. त्याचा सगळा निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे, असे सरकारचे धोरण आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण आणि 272 व्या घटनेनुसार जिथे गाव सुरु होतो तेथून जास्तीत जास्त विकासाला निधी दिला पाहिजे हे सरकारचे धोरण आहे. राज्य आता कशावर निर्णय घेतात मला माहिती नाही. केंद्राने राबवलेल्या चला खेडेगावाकडे या योजनेमुळे शेतकऱयांचा जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला. स्वयंरोजगार असेल नरेगासारख्या योजना असतील. गाव हा स्वयंपूर्ण करण्याचा विचार केंद्र सरकार करते आहे. त्याचा आता फायदा होत आहे. हे त्यांना माहिती आहे हे कोणामुळे झाले इतकं, त्यांना कधीच झाले नव्हते. भाजपाला मतदारांचा चांगला बेस ग्रामीण भागात मिळाला आहे. त्याच्या आधारे जिह्यात निवडणुका लढवत आहोत. कार्यंकर्ते सक्रीय आहेत. एकत्रित काम करावे, म्हणून माझा दौरा होता, असे त्यांनी सांगितले.
खासदार झाल्यानंतर प्रथमच साताऱयाला आलो. 95 सालापासून सातारा जिल्हय़ाचा संपर्क मोठा आहे. आतापर्यंत 600 ते 700 गावांना जावून आलेलो आहे वेगवेगळय़ा मार्गाने जिह्याचे प्रश्न मला माहिती आहेत. जिह्यातील राजकारण कसं चालतं याचा मला पूर्ण अभ्यास आहे. भविष्यकाळात भाजपाची वाटचाल चांगली चालेल, अशी मला खात्री आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवा, संघटन मजबूत व्हावा म्हणून आजचा माझा दौरा होता, असे त्यांनी सांगितले.
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागताबाबत बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादीकडे बक्षीस देण्यासाठी पैसे खूप आहेत. मी फुल देवून स्वागत केले, अशी टीप्पणी केली. पुढे नारायण राणे यांची सुरक्षा काढल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना संरक्षणाची गरज नाही. कार्यकर्ते हेच मोठे संरक्षण आहे, अशी टीप्पणी त्यांनी ठाकरे सरकारवर केली.