प्रतिनिधी/ रत्नािगरी
गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावानंतरही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात मंगळवार 5 ते 9 ऑक्टोबर हे पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन दसऱयात घटस्थापनेच्या मुहूर्तावर जिल्ह्य़ात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ऑक्टोबरमध्ये पर्जन्यमान कमी होण्याची अपेक्षा होती. गेल्या 3 दिवसांपासून कडाक्याच्या उन्हाचे जोरदार चटके जाणवू लागल्याने ऑक्टोबर हिट सुरू झाल्याचा प्रत्यय येऊ लागला होता. पण पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे. पर्जन्यमानविषयक संदेशानुसार 5 ते 9 ऑक्टोबर या काळात जिह्यात काही ठिकाणी विजांचा गडगडाट व वादळी वाऱयासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पावसाच्या सावटाने भातकापणीच्या कामाला पुन्हा ब्रेक लागला आहे. असाच पाऊस राहिल्यास कापणीस आलेल्या भातपिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.