खानापूर तालुक्मयात सर्वात जास्त 23.03 टक्के पेरणी, रामुदर्ग तालुक्मयात सर्वात कमी
प्रतिनिधी / बेळगाव
खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. मागील वषीपेक्षाही यावषी जिल्हय़ामध्ये जिल्हा कृषी विभागाने खरीप पेरणीच्या उद्दिष्टामध्ये वाढ केली आहे. गतवर्षी 6 लाख 88 हजार 120 हेक्टरमध्ये पीक घेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. यावषी त्यामध्ये वाढ करून 7 लाख 16 हजार 925 हेक्टरमध्ये पीक घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पेरणीला सुरुवात झाली असून आतापर्यंत केवळ 5.39 टक्केच पेरणी पूर्ण झाली आहे.
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱयांनी खरीप पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. अधिक पाऊस झाल्यामुळे मशागतीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला होता. गेल्या चार दिवसांपासून पावसाने चांगली उघडीप दिली आहे. त्यामुळे खरीप पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. 15 दिवसांपूर्वी चक्रीवादळामुळे बेळगाव परिसरातही दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱयांनी घाईगडबडीतच मशागत केली आहे तर काही शेतकरी अजूनही मशागतीच्या कामामध्ये गुंतले आहेत. बेळगाव तालुक्मयात तसेच इतर परिसरात भात, सोयाबिन, मूग पेरणीला सुरुवात झाली आहे.
यावर्षी 7 लाख 16 हजार 925 हेक्टरचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. भात 61 हजार 700 हेक्टर, जेंधळा 11 हजार 580, मक्का 1 लाख 20 हजार हेक्टर, तूरडाळ 11 हजार 140, उडीद 10 हजार 570, भूईमूग 26 हजार 155, सूर्यफूल 4 हजार 605 हेक्टर, सोयाबिन 98 हजार 140, कापूस 36 हजार 830 हेक्टर, ऊस 2 लाख 74 हजार 950 हेक्टर, तंबाखूची 5 हजार 990 हेक्टरमध्ये लागवड होणार
आहे.
बी-बियाणे, खते उपलब्ध
कृषी विभागातर्फे बी-बियाणे, खते उपलब्ध करण्यात आली आहेत. याचबरोबर शेतकऱयांना लागणारी सर्व औषधेही उपलब्ध केली आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. पावसाने आता उघडीप दिली असून लवकरच संपूर्ण पेरणी पूर्ण होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र सध्या केवळ 5.39 टक्के म्हणजेच 38 हजार 628 हेक्टरमधील पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत पेरणी पूर्ण होण्याची शक्मयता आहे.