प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुलभूत आरोग्य सुविधा हा भारतीय संविधानाने सर्वांना दिलेला हक्क आहे. रत्नागिरी जिह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा पूर्णतः ढासळलेली असून या हक्काची पायमल्ली होता नये यासाठी आरोग्य यंत्रणा जनजागरण अभियान हाती घेण्याचा निर्णय समविचारी मंचने घेतला आहे.
गेली पंधरा ते वीस वर्षे जिह्यातील अरोग्य सेवा ढासळलेली आहे. निदान कोरोनाच्या महाभयंकर संकटात तरी या प्रश्नाची तड लावण्यासाठी जिह्यातील तडफदार लोकप्रतिनिधी पुढे येण्याची अपेक्षा फोल ठरली. जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी एकही निष्णात फिजिशियन नसावा हे अपयश कोणाचे असा संतापजनक सवाल महाराष्ट्र समविचारी मंचने उपस्थित केला आहे.
जिह्यातील आरोग्य यंत्रणा हा एकच विषय घेऊन संपूर्ण जिह्यात जनजागरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून समविचारी मंचतर्फे 15 ऑगस्ट रोजी एक दिवस लाक्षणिक उपोषण केले. तरीही जिल्हा प्रशासनाने वा कुणाही लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याबद्दल समविचारी मंचाने खंत व्यक्त केली आहे. पक्षीय अभिनिवेश न बाळगता या अभियानांत जिह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी एक सामाजिक ऋण म्हणून सहाभागी व्हावे असे आवाहन समविचारी मंचने केले आहे.
या अभियानाच्या पुढील टप्प्यात जिह्यातील सव्वालाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले जाणार आहे. त्यानंतर जिह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठराव मिळविले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताचे कारण सांगत साठी परीक्षेचा घोळ घालणाऱया शासन आणि लोकप्रतिनिधींनी आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर भर द्यावा असेही समविचारींनी म्हटले आहे.