प्रतिनिधी / सांगली
जिल्हय़ात शनिवारी नवीन 830 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या 28 हजार 521 झाली आहे. तर दिवसभरात 730 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 36 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 32 आणि परजिल्हय़ातील चौघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 1070 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
मनपाक्षेत्रात 186 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात शनिवारी 186 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 98 तर मिरज शहरात 88 रूग्ण वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांपासुन सांगली शहरात मोठयासंख्येने रूग्ण वाढत होते. पण शनिवारी ही संख्या कमी आहे. महापालिका क्षेत्रात आता घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना कोरोनाचा त्रास होत आहे. त्यांची तपासणीही सुरू करण्यात आल्याने ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 11 हजार 900 झाली आहे.
ग्रामीणभागात 644 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात शनिवारी 644 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 79, जत तालुक्यात 33, कडेगाव तालुक्यात 109 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 39, खानापूर तालुक्यात 48, मिरज तालुक्यात 55 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 105, शिराळा तालुक्यात 52, तासगाव तालुक्यात 47 आणि वाळवा तालुक्यात 77 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 32 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 32 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कुपवाड शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील एकाचा, जत तालुक्यातील एकाचा, कडेगाव तालुक्यातील पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील चार जणांचा, मिरज ग्रामीण भागातील सहा जणांचा मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील दोन जणांचा, शिराळा तालुक्यातील एकाचा आणि वाळवा तालुक्यातील तब्बल आठ जणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. जिल्हय़ातील एकूण 32 जणांचा शनिवारी मृत्यू झाला आहे. आजअखेर 1070 जणांचे मृत्यू झाले आहेत.
परजिल्हय़ातील चौघांचा मृत्यू
परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱ्या चौघांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्हय़ातील एका व्यक्तीचा कोरोना रूग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर कोल्हापूर जिल्हय़ातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर पर जिल्हय़ातील 155 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.
730 जणांची कोरोनावर मात
जिल्हय़ात शनिवारी 730 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही 17 हजार 633 झाली आहे. जवळपास 60 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्हय़ात मोठय़ाप्रमाणात रूग्ण वाढत असतानाच कोरोनामुक्त होणारे रूग्णही वाढत चालल्याने जिल्हय़ाला हा मोठा दिलासा मिळत आहे.
2603 जणांचे स्वॅब तपासले
जिल्हय़ात शनिवारी दोन हजार 603 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील 890 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये एक हजार 713 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 830 रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 28521
बरे झालेले 17633
उपचारात 9818
मयत 1070