रुग्णसंख्या अधिक असल्याने हिरेबागेवाडी प्रतिबंधितच
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचे रुग्ण आढळल्याने बेळगाव शहर व जिल्हय़ातील सुमारे 12 गावे, गल्ल्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱयांनी घोषित केले आहे. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये ही संख्या घटणार असून केवळ हिरेबागेवाडीला मात्र प्रतिबंधित क्षेत्र कायम ठेवावे लागणार आहे.
जिह्यात आतापर्यंत 107 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर हिरेबागेवाडी येथील एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत हिरेबागेवाडी गावात 48 जणांना लागण झाली आहे. त्यानंतरचा क्रमांक रायबाग तालुक्मयातील कुडची या गावचा लागतो. या एकाच गावातील 22 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
बेळगुंदी, बेळगाव शहरातील अमाननगर, आस्मा कॉलनी, पिरनवाडी, येळ्ळूर, आझाद गल्ली येथील प्रत्येकी एकाला तर कॅम्प येथील चौघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. संकेश्वर येथील पाच जणांचा समावेश आहे. शनिवारी अजमेरहून परतलेल्या बेळगाव व बागलकोट जिल्हय़ातील 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 22 जण बेळगाव जिल्हय़ातील आहेत तर 8 जण बागलकोट जिल्हय़ातील आहेत.
उपलब्ध माहितीनुसार अजमेरहून परतलेल्या व अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 22 जणांपैकी हुक्केरी तालुक्मयातील 12, बेळगाव येथील 1, चिकोडी येथील 2, रायबाग येथील 5, अथणी व निपाणी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. शासकीय नियमांनुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी त्या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करतात.
सध्या बेळगुंदी, हिरेबागेवाडी, कॅम्प, अमाननगर, आस्मा कॉलनी, पिरनवाडी, येळ्ळूर, कुडची, संकेश्वर, आझाद गल्लीला प्रतिबंधित प्रदेश म्हणून जिल्हाधिकाऱयांनी जाहीर केले आहे. हिरेबागेवाडी वगळता इतर ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत प्रतिबंधित क्षेत्र हटविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
एका हिरेबागेवाडीत 48 जण कोरोना पॉझेटिव्ह आढळून आल्याने हे गाव प्रतिबंधित क्षेत्र असणार आहे. कारण या एकाच गावातील आणखी 200 हून अधिक जणांचे स्वॅबतपासणी अहवाल यायचे आहेत. कोरोनाबाधित व त्यांच्या संपर्कातील नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या गावातील रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्मयता आहे. त्यामुळेच हिरेबागेवाडी प्रतिबंधित क्षेत्र असणार आहे. एखादा रुग्ण आढळून आला तर ज्या गावात किंवा गल्लीमध्ये 28 दिवसांत एकही रुग्ण आढळून आला नाही अशा भागाला प्रतिबंधित क्षेत्र मुक्त करण्यात येणार आहे.