प्रतिनिधी/ रत्नागिरी
केंद्र शासनाने बँकाच्या खासगीकरणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱयांनी 2 दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आह़े त्यानुसार रत्नागिरी जिह्यातही 15 व 16 मार्च रोजी बँक कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती रत्नागिरी बँक कर्मचारी समन्वय समितीचे सचिव राजेंद्र गडवी यांनी दिली.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात आय़ ड़ी ब़ी आय. व 2 सरकारी बँकांचे खासगीकरण करणार असल्याची घोषणा केली होत़ी यामुळे बँक कर्मचारीवर्गात संताप व्यक्त करण्यात येत आह़े खासगीकरण करताना थकित कर्जाची बाब सरकारकडून पुढे करण्यात येत आह़े मात्र थकित कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया उभी करणे, ही सरकारची जबाबदारी आह़े मात्र आपले अपयश झाकण्यासाठी सरकारने खासगीकरणाचा मार्ग अवलंबला आहे, असे गडवी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आह़े