प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना बाधितांची संख्या कमी होत चालली आहे. यामुळे दिलासा मिळत आहे. मंगळवारी केवळ 12 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्हय़ामध्ये सध्या केवळ 142 जण सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
कोरोनामुळे जनता हताश झाली होती. प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती. कोरोना म्हणताच साऱयांना धक्का बसत होता. मात्र, आता सर्वांनाच लढण्याची ताकद आली आहे. असे असले तरी प्रत्येकाने कोरोनाबाबत सावध राहणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे, यामुळे दिलासा मिळत आहे.
पूर्वी दिवसाला 500 ते 600 रुग्ण आढळत होते. काही दिवशी हजारांचा आकडाही ओलांडला होता. प्रत्येक जण कोरोनाला घाबरत होते. मात्र, आता हा आकडा कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी जिह्यामध्ये केवळ 12 जण आढळले आहेत. सोमवारी 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आरोग्य विभागाने काही प्रमाणात सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तरीदेखील प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळूनच आपले व्यवहार करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.