प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ात छत्रपती शिवाजी महाराज जयंती व आगामी होणाऱया निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीस पक्षांचे पूर्वतयारीनिमित्त होणारे कार्यक्रम त्याचप्रमाणे वैयक्तिक मागण्यांकरिता उपोषण, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको यासारखी आंदोलने सुरळीत पार पाडून कोठेही अनुचित प्रकार घडू नये. जिल्हय़ात जातीस सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या सर्व भूभागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) 4 ते (फ) आणि 37 (3) प्रमाणे 13 ते 27 फेब्रुवारी 2021 दरम्यान मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 नुसार शिक्षेस पात्र राहील, याची जिल्हय़ातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.