बेळगाव : कोरोना महामारीचा फैलाव सुरूच आहे. चिकोडी, बेळगाव तालुक्मयात रुग्णसंख्या वाढतच आहे. हे दोन तालुके वगळता सौंदत्ती, रामदुर्ग, खानापूर तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही. गेल्या 24 तासात 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर 51 जणांनी कोरोनावर मात केली.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण बाधितांची संख्या 78 हजार 467 इतकी झाली आहे. आतापर्यंत 77 हजार 99 जणांनी कोरोनावर मात केली. सध्या 498 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. शुक्रवारी अथणी तालुक्मयात पाच, बेळगाव तालुक्मयात सोळा, चिकोडी तालुक्मयात एकवीस, बैलहोंगल, गोकाक, हुक्केरी तालुक्मयात प्रत्येकी एक व रायबाग तालुक्मयात चौघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अद्याप 2 हजार 867 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.
आतापर्यंत 11 लाख 11 हजार 874 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 10 लाख 2 हजार 606 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. वाढती रुग्णसंख्या व कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेवून राज्य सरकारने बेळगावसह महाराष्ट्र व केरळच्या सीमेवरील जिल्हय़ात विकेंड लॉकडाऊन जारी केला आहे.
कर्फ्यूसंबंधी जिल्हाधिकाऱयांचा आदेश
रात्रीच्या कर्फ्यूसंबंधी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शुक्रवारी एक आदेश जारी केला आहे. सरकारने कर्फ्यूची वेळ 9 ऐवजी रात्री 10 वर नेली होती. आता यावेळेत बदल करण्यात आला असून पूर्वीप्रमाणे रोज रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू असणार आहे. शुक्रवारी रात्री 9 ते सोमवारी पहाटे 5 पर्यंत विकेंड कर्फ्यूही जारी करण्यात आला आहे. या काळात सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहे. लग्न समारंभासाठी 100 जणांची व अंत्यसंस्कारासाठी 20 जणांची मर्यादा ठरविण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.