प्रतिनिधी / कुडाळ:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात येत्या पाच दिवसांमध्ये वातावरण ढगाळ राहणार असून 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत तुरळक ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र (मुंबई) यांच्याकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच कमाल व किमान तापमानात वाढ होऊन आर्द्रतेमधील घटीबरोबर ढगाळ हवामानाची शक्यता आहे. त्यामुळे आंबा व अन्य पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंबा फळांची गळ होण्याची भीती कृषी सल्ल्यात व्यक्त करण्यात आली आहे.