प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात आठव्या दिवशी देखील एसटी कर्मचाऱयांच्या संपाचा तिढा कायम आह़े दरम्यान जिल्हय़ात एसटीचे 64 कर्मचारी कामावर हजर राहिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सोमवारी जिल्हय़ात केवळ राजापूर आगारातून 3 गाडय़ा सोडण्यात आल्य़ा एसटी महामंडळाचे नुकसान लक्षात घेत कर्मचाऱयांनी मंगळवारपासून कामावर हजर रहावे, असे आवाहन प्रभारी विभागिय नियंत्रक प्रमोद जगताप यांनी केले आह़े
एसटीच्या संपाबाबत न्यायालयीन लढा सुरू असतानाच कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत़ एसटी संघटनांच्या पदाधिकाऱयांशी अधिकारी वर्ग सातत्याने बोलणे करत आहे. एसटीचे 30 कर्मचारी यापूर्वीच हजर राहिले होत़े त्यामध्ये आता भर पडली आहे. सोमवारपर्यंत 64 कर्मचारी कामावर हजर झाल़े सकाळपासून जिल्हय़ात केवळ राजापूर आगारातून राजापूर-नाटे, राजापूर- बुरबेवाडी, राजापूर-पाचल अशा 3 गाडय़ा सोडण्यात आल्य़ा
दरम्यान एसटी कर्मचाऱयांच्या मागण्यांविषयी न्यायालयाने 22 नोव्हेंबरची तारीख दिली आह़े त्यामुळे पुढील 8 दिवस संप सुरू राहिल्यास महामंडळाला मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आह़े रत्नागिरी विभागाला आतापर्यंत साडे चार कोटींचा फटका बसला आह़े आधीच तोटय़ात असलेल्या एसटीला फटका बसण्यासह प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागत आह़े विविध ठिकाणी प्रवासासाठी खासगी वाहतूकीचा आधार घेतला जात आह़े काही वडाप व खासगी वाहतूकदार अधिक पैसे उकळत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत़
जिल्हय़ात 11 नोव्हेंबर पासून शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत मात्र बस सुरू नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आह़े ग्रामीण भागात पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत़ जिल्हय़ामध्ये एसटीच्या 4 हजार 500 फेऱयांना या संपाचा फटका बसला आहे. दररोज सुमारे 70 लाख रूपयांचे नुकसान होत आह़े आतापर्यत रत्नागिरी आगारातील 18 तर राजापूर आगारातील 9 अशा 27 कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात आले आह़े
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कामावर या…!
मागील आठ दिवस चाललेल्या संपामुळे जिल्हय़ातील एसटी प्रवाशांचे हाल होत आहेत़ न्यायालयाने 22 नोव्हेंबर ही पुढील तारीख दिल्याने आणखी 8 दिवस संप सुरू राहिल्यास एसटीला मोठे नुकसान सहन करावे लागेल़ यासाठी एसटी कर्मचाऱयांनी कामावर हजर रहावे, असे आवाहन प्रभारी विभागिय नियंत्रक प्रमोद जगताप यांनी केले आहे.