तुफान आलय म्हणत नागरिकांनी फोडला दगडाला पाझर
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात दुष्काळाच्या झळा दरवषीं माण, खटाव या तालुक्यांना बसतात. परंतु 2013, 2008 यावर्षी जोराचा दुष्काळ पडला होता. त्यावेळी पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी तत्कालिन जिल्हाधिकाऱयांना टँकर खरेदी करावे लागले होते. ते टँकर बांधकाम विभागात उभे आहेत. दुष्काळी तालुक्यातील ग्रामस्थांनी हातात हात घेवून टिकाव खोरे उचलून तुफान आलय म्हणत माळावरील दगडालाही फाझर फोडला आहे. त्यामुळे यावर्षी दुष्काळी तालुक्यातील एकाही गावाला टँकरने पाणी पुरवठा होत नाही. दुष्काळी तालुक्यात तलावात पुरेसे पाणी आहे.
दुष्काळ हा जिह्यातील माण, खटाव, कोरेगाव, फलटण या तालुक्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. हा दुष्काळ पिढय़ान् पिढय़ा तेथील जनतेने पाहिला आहे. पावसाने जरा जरी ओढाताण दिली तरी पाण्यासाठी वणवण होत असते. हाच दुष्काळ संपवण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी आपली गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी एकीने बळ घेवून हातात हात घेवून श्रमदान केले. गावासाठी गावाच्या पाण्यासाठी गावातील ज्येष्ठ, लहान थोर राबली. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही असे म्हणत हाती फावडे, टिकाव घेवून काम केली. फक्त त्यांना काही संस्था संघटना यांनी मोटीव्हेट केले. त्यामुळे त्यांना आणखी हुरूप आले. आपल्या गावासाठी तुफान आलया म्हणत काम करु लागले. त्याच कामाचा प्रत्यय आणि वेळेवर होत असलेला पाऊस यामुळे दुष्काळी तालुक्यातील जल साठे भरुन राहू लागले आहेत. त्यावेळच्या अधिकाऱयांनीही अगदी निरपेक्ष भावनेने काम केले. त्यामध्ये तत्कालिन जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे असतील, तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी असतील, जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, डॉ. कैलास शिंदे असतील यांनीही त्या गावांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून प्रेरणा दिली. त्यामुळे दुष्काळाच्या झळा झेलणाऱया या तालुक्यातील पाण्याचा स्तर वाढला आहे. भुजलसाठा उंचावला आहे. जानेवारीमध्ये भुजल सर्व्हेक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या अहवालामध्ये हा निकष पुढे आलेला आहे. जिह्यात एकही टँकर अद्यापपर्यंत सुरु नाही. हे त्या यशाचे गमक आहे.
भूजल पातळी पुढील प्रमाणे जानेवारी 2008 ते जानेवारी 2012 मधील सरासरी भुजल पातळी ही जावली तालुक्यात 1.56 मीटर, कराड तालुक्यात 3.39 मीटर, खंडाळा तालुक्यात 3.78 मीटर, खटाव तालुक्यात 6.02 मीटर, कोरेगाव तालुक्यात 5.08 मीटर, माण तालुक्यात 5.08 मीटर, महाबळेश्वर तालुक्यात 12.78 मीटर, पाटण तालुक्यात 2.71 मीटर, फलटण तालुक्यात 4.38 मीटर, सातारा तालुक्यात 3.99 मीटर, वाई तालुक्यात 6.13 मीटरवर होती. तर 2013 मध्ये जावली तालुक्यात 1.70 मीटर, कराड तालुक्यात 3.77 मीटर, खंडाळा तालुक्यात 4.74 मीटर, खटाव तालुक्यात 9.33 मीटर, कोरेगाव तालुक्यात 6.59 मीटर, माण तालुक्यात 9.41 मीटर, महाबळेश्वर तालुक्यात 13.57 मीटर, पाटण तालुक्यात 2.71 मीटर, फलटण तालुक्यात 7.48 मीटर, सातारा तालुक्यात 4.43, वाई तालुक्यात 7.41 मीटर होती.
तर जानेवारी 2016 ते 2020 पर्यंत भुजल पातळी जावली तालुक्यात 1.88 मीटर, कराड तालुक्यात 3.71 मीटर, खंडाळा तालुक्यात 3.55 मीटर, खटाव तालुक्यात 6.79 मीटर, कोरेगाव तालुक्यात 5.59 मीटर, माण तालुक्यात 6.56 मीटर, महाबळेश्वर तालुक्यात 12.84 मीटर, पाटण तालुक्यात 3.06 मीटर, फलटण तालुक्यात 4.97 मीटर, सातारा तालुक्यात 4.06 मीटर, वाई तालुक्यात 6.61 मीटर, जानेवारी 2021 पर्यंत जावली तालुक्यात 1.50 मीटर, कराड तालुक्क्यत 2.91 मीटर, खंडाळा तालुक्यात 2.52 मीटर, खटाव तालुक्यात 4.67 मीटर, कोरेगाव तालुक्यात 4.01 मीटर, माण तालुक्यात 4.28 मीटर, महाबळेश्वर तालुक्यात 11.30 मीटर, पाटण तालुक्यात 2.54 मीटर, फलटण तालुक्यात 4.43 मीटर, सातारा तालुक्यात 3.29 मीटर, वाई तालुक्यात 5.01 मीटरवर आले.