पहिल्या टप्प्यात 261 तर दुसऱया टप्प्यात 220 ग्रा.पं.निवडणुका
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्यातील एकूण 5 हजार 762 ग्राम पंचायतींच्या निवडणुका होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. जिह्यातील एकूण 481 ग्राम पंचायतींची निवडणूक होणार असून ही निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 261 ग्राम पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. दुसऱया टप्प्यात 220 ग्राम पंचायतींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. निवडणुका जाहीर झाल्यामुळे सोमवारपासूनच आचारसंहिता लागू झाली असून सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
जिह्यामध्ये एकूण 25 लाख 53 हजार 153 मतदार आहेत. 12 लाख 99 हजार 870 पुरुष तर 12 लाख 53 हजार 283 महिला मतदार आहेत. जिह्यात एकूण 14 तालुके आहेत तर 506 ग्राम पंचायती आहेत. मात्र, यामधील 25 ग्राम पंचायतींची मुदत संपली नाही. त्यामुळे त्यांची निवडणूक नंतर घेतली जाणार आहे.
बेळगाव जिह्यातील पहिल्या टप्प्यात 22 डिसेंबर रोजी बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक, मुडलगी अशा सात तालुक्मयांतील एकूण 261 ग्राम पंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. दुसऱया टप्प्यात म्हणजे 27 डिसेंबर रोजी सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड, रायबाग अशा एकूण 220 ग्राम पंचायतींसाठी मतदान होणार आहे.
बेळगाव तालुक्मयात एकूण 59 ग्राम पंचायती आहेत. त्यामधील 57 ग्राम पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. खानापूर तालुक्मयात एकूण 51 ग्राम पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. हुक्केरी तालुक्मयामध्ये 52 ग्राम पंचायती असून त्या सर्वांची निवडणूक पहिल्याच टप्प्यात होणार आहे. बैलहोंगल तालुक्मयामध्ये एकूण 34 ग्रा.पं. असून त्यामधील 33 ग्रा.पं.ची निवडणूक होणार आहे. कित्तूर तालुक्मयामध्ये एकूण 16 ग्रा.पं. आहेत. त्या सर्व ग्रा.पं.ची निवडणूक होणार आहे. गोकाक तालुक्मयात एकूण 36 ग्रा.पं. आहेत. त्यामधील 32 ग्राम पंचायतींची निवडणूक होणार आहे. मुडलगी तालुक्मयातील सर्व 20 ग्राम पंचायतींची निवडणूक होणार आहे.
दुसऱया टप्प्यामध्ये सौंदत्ती तालुक्मयातील 45 ग्राम पंचायतमधील 41 ग्रा.पं.ची निवडणूक होणार आहे. रामदुर्ग तालुक्मयातील 37 ग्राम पंचायतमधील 33 ग्राम पंचायतांच्या निवडणुका होणार आहेत. चिकोडी तालुक्मयातील सर्व 36 ग्राम पंचायतींची निवडणूक होणार आहे. निपाणी तालुक्मयातील सर्व 27 ग्राम पंचायतींची निवडणूक होणार आहे. अथणी तालुक्मयातील 46 ग्रा. पं.पैकी 41 ग्राम पंचायतींची निवडणूक होणार आहे. कागवाड तालुक्मयातील सर्व 9 ग्राम पंचायतींची निवडणूक होणार आहे. रायबाग तालुक्मयातील 38 ग्रा.पं.पैकी 33 ग्राम पंचायतींची निवडणूक होणार आहे.
एकूण 506 ग्राम पंचायती आहेत. मात्र त्यामधील 481 ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. त्यामुळे आता या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मागील अनेक दिवसांपासून इच्छुकांनी आपल्या गुप्त प्रचाराला सुरुवात केली होती. आता निवडणुका जाहीर झाल्याने साऱयांनीच शड्डू ठोकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुका चुरशीच्या होणार यात शंका नाही.
पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम
अर्ज दाखल : 7 डिसेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत
दुसरा टप्पा : 11 डिसेंबर ते 16 डिसेंबपरपर्यंत
अर्ज माघारची तारीख : 14 ते 19 डिसेंबर
मतदान : पहिला टप्पा- 22 डिसेंबर
मतदान : दुसरा टप्पा- 27 डिसेंबर
मतदान करण्याची वेळ : सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत.
मतमोजणी : दि. 30 डिसेंबर सकाळी 8 पासून.