प्रतिनिधी/ रत्नागिरी, राजापूर
जिल्हय़ातील कोरोना लसीचा साठा पूर्णपणे संपला असून बुधवारी शेकडो लोकांना लसीकरण केंद्रावरून माघारी जावे लागले. लस संपल्याने आजपासून जिह्यातील लसीकरण बंद होणार आहे. नवीन साठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत ही समस्या कायम राहणार असल्याचे आरोग्य अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
जिह्याला लसीकरणाच्या दुसऱया मात्रेसाठी 1100 डोस देण्यात आले होते. हा साठादेखील संपला आहे. जिल्हय़ातील सर्वच लसीकरण केंद्रावर लसीचा तुटवडा आहे. गेल्या 2 दिवसांपासून काही सेंटरवरून नागरिकांना माघारी जावे लागले होते तर काही केंद्रांवर मर्यादित साठा शिल्लक होता. बुधवारी बहुतांश सल संपल्यामुळे जिल्ह्तील लसीकरण थांबवण्याची नामुष्की आली आहे. एकीकडे लसीकरणासाठी आवाहन सुरु असताना दुसरीकडे लसच उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला असतानाच लसीचा साठा संपल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तिसऱया दिवशीच रायपाटण रूग्णालयात तुटवडा
राजापूर तालुक्यातील रायपाटण ग्रामीण रूग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरु झाल्याच्या तिसऱयाच दिवशी लसीचा तुटवडा झाल्याने बुधवारी अनेकांना लस उपलब्ध नसल्याने परत जावे लागले. राजापूर तालुक्यात केवळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात लसीकरण केंद्र सुरू होते. 5 एप्रिलपासून रायपाटण ग्रामीण रूग्णालयात केंद्र सुरू करण्यात आले होते. पहिल्या 2 दिवसांमध्ये 160 डोस देण्यात आले. त्यानंतर तिसऱया दिवशी केवळ 40 जणांची नोंदणी करून उर्वरित लोकांना परत पाठविण्यात आले. महिला, वयोवृध्दांना लस न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
जैतापूर आरोग्य केंद्रातही लसीचा तुटवडा जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीचा तुटवडा असल्याची माहिती पुढे आली आहे. लसीकरणासाठी गेलेल्या नागरिकांना लस उपलब्ध नसल्याने परत पाठवण्यात आले. दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्यांनाही वैद्यकीय अधिकाऱयांनी लस उपलब्ध नसल्याचे तसेच लस केव्हा उपलब्ध होणार, हे देखील माहिती नसल्याचे सांगितले. संबंधित रूग्णालय किंवा आरोग्य विभागाकडून तशी कोणतीच पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागला.