प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यातील सहा नगरपालिकांच्या विद्यमान नगरसेवक, पदाधिकाऱयांचा कार्यकाल दि. 24 रोजी संपला आहे. त्याअनुषंगाने शासनाने दि. 27 रोजी सायंकाळी उशिरा प्रशासक नियुक्तीचा अद्यादेश काढण्यात आला आहे. त्या अद्यादेशामुळे मंगळवारी सातारा, कराड, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, वाई या सहा नगरपालिकेवर मुख्याधिकारी हे प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत. तर पाचगणी आणि महाबळेश्वर पालिकांचा कार्यकाल दि. 30 रोजी संपणार असल्याने त्याचदिवशी प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे, तसा आदेश नगरविकास विभागाकडून काढण्यात आलेला आहे. मंगळवारी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून आता प्रारुप आराखडय़ाकडे सगळयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
कोरोनामुळे पालिकेच्या विद्यमान नगरसेवक, नगराध्यक्ष, विषय समितीच्या सभापतींची मुदत संपली तरीही त्यास मुदतवाढ दिली जाते की काय अशी चर्चा रंगत होती. आता प्रशासक नियुक्ती केल्याने त्यास पुर्णविराम मिळाला आहे. सातारा जिह्यातील सातारा, कराड, वाई, रहिमतपूर, म्हसवड, फलटण अशा सहा नगरपालिकांचा कार्यकाल संपल्याने त्यावर प्रशासक म्हणून त्या पालिकांचे मुख्याधिकाऱयांकडे कार्यभार देण्याबाबतचे परिपत्रक काल सायंकाळी उशिरा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून काढण्यात आले. त्यानुसार या सहा नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱयांनी आपला पदभार स्वीकारला आहे. दरम्यान, पाचगणी आणि महाबळेश्वर या दोन नगरपालिकांवर दि. 30 रोजी मुख्याधिकारी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
प्रारुप आराखडय़ाकडे नजरा
जिह्यातील सहा नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त झाले आहेत. त्या सर्वच पालिकांमध्ये आता कच्चा प्रारुप आराखडा तयार करण्यात आलेलाच पक्का होईल या शक्यतेवर अनेकांनी चर्चा, तर्कवितर्काना उधाण आले आहे. पक्का आराखडा कसा तयार होईल याकडे आता नजरा लागून राहिल्या आहेत.