प्रतिनिधी/ रत्नागिरी
एसटीचे शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी संपावर गेलेल्या जिह्यातील 12 कर्मचाऱयांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आह़े हे सर्व 12 चालक-वाहक चिपळूण आगारातील आहेत़ 24 तासात नोटीसीला उत्तर न दिल्याने ही कारवाई करण्यात आल़ी इतर कर्मचाऱयांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आल़े शनिवारी चिपळूण आगारातून चिपळूण ते रत्नागिरी अशी बस सोडण्यात आल़ी
कामावर हजर रहावे की नाही, या संदर्भात एसटी कर्मचाऱयांमध्ये संभ्रमावस्ता आह़े 13 दिवसांच्या संपानंतर काही कर्मचारी कामावर हजर राहण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचे तर काही विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. 22 तारखेला न्यायालयात होणाऱया सुनावणीकडे एसटी कर्मचाऱयांचे लक्ष लागून राहिले आह़े यानंतर कर्मचारी अंतीम निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े
एसटी संपात सहभागी रत्नागिरी विभागातील 249 कर्मचाऱयांना सेवा समाप्तीची नोटीस बजावत 24 तासात कामावर हजर होण्याचा इशारा देण्यात आला होत़ा यातील 12 कर्मचाऱयांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आह़े पुढील 2 दिवसांत अन्य कर्मचाऱयांवरही कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आल़े
सलग 13 दिवस सुरू असलेल्या या संपामुळे एसटीला मोठे नुकसान सहन करावे लागत आह़े संपाचा विद्यार्थ्यांसह जिह्यातील बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला आह़े दुकानांतील कामगार शहरालगतच्या ग्रामीण भागातून येत असतात. या कामगारांना एसटी उपलब्ध नसल्याने दुकानांमध्ये कामगारांची वानवा दिसत आह़े त्याचप्रमाणे ग्राहकांची संख्याही कमी झाली आह़े याचा मोठा फटका व्यापारीवर्गाला बसताना दिसत आह़े