प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यातील 878 ग्रामपंचायतीमध्ये 2 हजार 813 वार्डमधून 7 हजार 266 उमेदवार निवडून देण्यासाठी 17 हजार 656 जणांनी अर्ज दाखल केले होते. छाननीच्या दिवशी जिह्यातील 252 जणांचे अर्ज बाद झाले होते. काल अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून 123 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर अंशतः 98 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. 2 हजार 631 उमेदवार बिनविरोध झाले असून आता 654 ग्रामपंचायतीमध्ये 9हजार521 जण निवडणूक रिंगणात आहेत.
जिह्यातील ग्रामपंचायत निवडणूक फिवर सुरू आहे. काल अर्ज मागे अन चिन्ह वाटप झाले. लढतीचे चित्र स्पष्ट झाले. सातारा तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून 21 ग्रामपंचायत बिनविरोध तर 17 ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. कराड तालुक्यातील 87 ग्रामपंचायतिसाठी मतदान होणार असून 17 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. पाटण तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर 17 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झालेल्या आहेत. कोरेगाव तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर चार ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. वाई तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून 9 ग्रामपंचायती बिनविरोध तर 10 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. खंडाळा तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून 6 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत तर 1 ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध होणार आहे. महाबळेश्वर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत 19 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. फलटण तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. जावली तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून 12 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर 25 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. माण तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर 1 ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाली आहे. खटाव तालुक्यातील 77 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून 9 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर 4 अंशतः बिनविरोध झाल्या आहेत.
निवडणूक लागलेल्या गावात दुरंगी लढती
जिह्यातील 654 ग्रामपंचायतीमध्ये 9 हजार521 उमेदवार निवडनुक लढवत आहेत. गावागावात दोन गटात चांगलाच प्रचार सुरू झाला आहे. कोणाचा चिन्ह काय तर कोणाच काय?,प्रचार मात्र जोरात सुरू आहे. वातावरण चांगलंच रंगू लागलं आहे.