प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात एसटी कर्मचाऱयांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर 43 एसटी कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ संपावर राज्यस्तरावरून तोडगा निघत नसल्याने एसटीची सेवा पूर्ववत करण्यासाठी स्थानिक स्तरावरूनच कारवाई करण्यात येत आह़े मंगळवारी एसटीचे 526 कर्मचारी कामावर हजर होत़े तर एकूण 220 फेऱया सोडण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
एसटीच्या फेऱया विविध आगारातून सुरू करण्यासाठी हजर झालेल्या कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात येत आहेत़ तर हजर कर्मचाऱयांमध्ये प्रशासकीय 217, कार्यशाळा 165, चालक 60, वाहक 56, चालक तथा वाहक 28 आदींचा समावेश आह़े तर 52 कर्मचारी हे अधिकृतरित्या सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दापोली व देवरूख आगारातून प्रत्येकी सुमारे 80 फेऱया सोडण्यात आल्या आहेत़ तर मंगळवारी जिह्याची एकूण प्रवासी संख्या 2 हजार 600 इतकी होत़ी
परिवहनमंत्री अनिल परब यांनी कामावर हजर न राहणाऱया कर्मचाऱयांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिले होत़े अद्याप अशा प्रकारची कोणतीही कारवाई झालेली नाह़ी मात्र स्थानिक स्तरावरूनच एसटी बस चालू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अधिकाऱयांकडून करण्यात येत आहेत. यामध्ये कर्मचारी संघटनांशी बोलणी सुरू आह़े जिह्याचा विचार करता रत्नागिरी आगार वगळता अन्य ठिकाणाहून बसफेऱया सोडण्यात आल्या आहेत़ प्रवाशांचा प्रतिसाद देखील या बसफेऱयांना मिळत असल्याचे दिसत आह़े
विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारी ठाम
मंगळवारी रत्नागिरी विभागीय कार्यालय या ठिकाणी एसटी कर्मचारी ठाण मांडून बसून असल्याचे दिसल़े येथे कर्मचाऱयांकडून घोषणाबाजी करण्यात आल़ी त्याचप्रमाणे विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारी ठाम असल्याचे सांगण्यात आल़े