प्रतिनिधी/रत्नागिरी
जिह्यामध्ये सोमवारी कमी प्रमाणात झालेल्या कोरोना चाचण्यांमुळे रूग्णसंख्येतही घट झाल्याचे दिसून येत आह़े मागील 24 तासात केवळ 3 हजार 798 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये 298 रूग्णांची नोंद करण्यात आली तर 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी जिह्यात आरटीपीसीआर टेस्टमध्ये 215 व ऍन्टीजेन टेस्टमध्ये 83 असे 298 रूग्ण मिळून आल़े जिह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 66 हजार 808 इतकी झाली आह़े तर मागील 24 तासांमध्ये 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आह़े जिह्यातील एकूण मृतांची संख्या आता 1 हजार 905 इतकी झाली आह़े तर रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर हा 2.85 इतका आह़े आरटीपीसीआरचा पॉझिटीव्हीटी रेट आहे 11.55 तर सर्वसामन्य पॉझिटीव्हीटी रेट आहे 7.86 टक्के एवढा आहे.
मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 3 तर चिपळूण मधील 2 जणांच समावेश आह़े तर सोमवारी 339 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल़े बरे झालेल्यांची एकूण संख्या 60 हजार 909 इतकी आह़े तर उपचारात 3 हजार 655 रूग्ण असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आह़े