प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनाने आणखी पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून शनिवारी नव्याने 116 बाधित आढळून आले आहेत़ मागील काही दिवस नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट होत असतानाही कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंची संख्या वाढत आह़े यामुळे जिह्याचा मृत्युदर पुन्हा 3 टक्क्यांवर पोहोचला आह़े
शनिवारी जिह्यात एकूण 3 हजार 675 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यात आरटीपीसीआरच्या 1 हजार 956 चाचण्यांपैकी 43 तर ऍन्टिजेनच्या 1 हजार 719 चाचण्यांपैकी 73 अहवाल बाधित आढळल़े यामध्ये मंडणगड 6 व दापोली प्रत्येकी 6, खेड 14, गुहागर 12, चिपळूण 17, संगमेश्वर 8, रत्नागिरी 42, लांजा 1 तर राजापूर 10 असे तालुकानिहाय रुग्ण सापडले. जिह्यातील बाधितांची एकूण संख्या 74 हजार 881 झाली आह़े आरटीपीसीआर चाचणींनुसार जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.19 टक्के आह़े
जिह्यात शनिवारी एकूण पाच मृत्यूची नोंद करण्यात आल़ी मृतांमध्ये खेड तालुक्यातील 2 तर चिपळूण, संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आह़े यामुळे जिह्यातील मृतांची एकूण संख्या 2 हजार 245 व मृत्युदर 3 टक्के झाला आह़े शनिवारी बरे झालेल्या 130 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े बरे झालेल्यांची एकूण संख्या 70 हजार 995 व प्रमाण 94.82 झाले आह़े 1 हजार 505 रुग्ण उपचारात दाखल असून यातील केवळ 301 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत़