प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने आणखी 30 मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 17 मृत्यू नोंदवण्यात आले. यामुळे जिह्यातील एकूण मृतांची संख्या 1 हजार 890 इतकी झाली आहे. तर शनिवारी नव्याने 473 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी जिल्ह्यात 5 हजार 721 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात आरटीपीसीआर टेस्टमध्ये 125 तर ऍन्टीजेन चाचणीत 348असे 473 कोरोनाबाधित रूग्ण मिळून आले. जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 66 हजार 41 इतकी झाली आहे. आरटीपीसीआर टेस्टचा विचार करत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 13.26 इतका आहे तर सामान्य पॉझिटिव्हिटी रेट 8.27 आहे.
मागील 24 तासांमध्ये 30 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मृतांमध्ये चिपळूण-2, खेड-1, राजापूर-2, रत्नागिरी-17 संगमेश्वर-1, गुहागर-1, दापोली-6 अशी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता 1 हजार 890 इतकी झाली आहे तर रत्नागिरी जिल्ह्याचा मृत्यूदर हा 2.86 इतका आहे. शनिवारी 396 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आले तर उपचारात 4 हजार 284 रूग्ण असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.