प्रतिनिधी/ रत्नागिरी
मंगळवारी जिह्यामध्ये कोरोनाने तब्बल 29 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्हय़ाचा मृत्यूदर 3 टक्क्यांच्या पुढे गेला आह़े जिह्यात मंगळवारी नव्याने 115 कोरोना बाधित आढळून आले. त्यातच रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरूग्णालयात 20 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आह़े दरम्यान प्रशासनाकडून प्रादेशिक मनोरूग्णालात योग्य ती खबरदारी घेण्यात येत आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हय़ात मंगळवारी एकूण 29 मृत्यू झाल़े मृतांमध्ये दापोलीतील 5, खेड 5, गुहागर 2, चिपळूण 7, रत्नागिरी 7 तर राजापूरातील 3 अशा 29 मृत्यूंची नोंद झाली आह़े यामुळे मृतांची एकूण संख्या 2 हजार 343 व मृत्यूदर 3.09 झाला आह़े जिल्हय़ात गेल्या काही दिवसात रूग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आह़े रूग्ण संख्या व मृतांच्या आकडय़ामध्ये होणारी वाढ धोक्याचा इशारा देत आह़े
मंगळवारी जिल्हय़ात एकूण 4 हजार 102 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 2 हजार 453 चाचण्यांपैकी 56 तर ऍन्टीजेनमध्ये 2 हजार 343 पैकी 29 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यामध्ये मंडणगड 4, दापोली 1, खेड 7, गुहागर 22, चिपळूण 45, संगमेश्वर 12, रत्नागिरी 22, लांजा 1 व राजापूर 1 असे तालुकानिहाय रूग्ण आढळले आहेत़ यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 75 हजार 867 झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टनुसार जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.77 टक्के झाला आह़े
मागील 24 तासात बरे झालेल्या 56 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 72 हजार 369 व प्रमाण 95.39 पर्यंत पोहोचले आह़े सध्या 1 हजार 74 रूग्ण उपचारात दाखल असून यापैके 265 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़
एकूण रूग्ण -77867
नवे रूग्ण -115
एकूण मृत्यू -2343
मृत्यू – 29