नव्याने 218 रूग्ण, मृतांचा आकडा वाढला
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनाने आणखी 28 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े यामुळे जिह्यातील मृतांचा एकूण संख्या 2 हजार 61 झाली आह़े कोरोनामुळे होणाऱया मृत्यूची संख्या अद्यापही चिंता वाढवणारी आह़े शुक्रवारी नव्याने 218 रूग्ण आढळून आले तर बरे झालेल्या 192 रूग्णांना घरी सोडण्यात आले.
मृतांमध्ये मंडणगड, संगमेश्वरात प्रत्येकी 1, खेड, राजापूर व गुहागर प्रत्येकी 2, लांजा 3, चिपळूण 5 तर रत्नागिरीतील सर्वाधिक 12 रुग्णांचा समावेश आह़े बरे झालेल्या 192 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या 67 हजार 7 व प्रमाण 94.02 झाले आह़े 2 हजार 26 रूग्ण उपचाराखाली असून त्यापैकी केवळ 447 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढलली आहेत़
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आरटीपीसीआरच्या 3 हजार 627 चाचण्यांमध्ये 118 तर 2 हजार 489 ऍन्टीजेन चाचण्यांत 100 असे नवे 218 रूग्ण सापडले. यामध्ये मंडणगड 3, दापोली 16, खेड 30, गुहागर 24, चिपळूण 41, संगमेश्वर 17, रत्नागिरी 58, लांजा 8 तर राजापूर तालुक्यातील 21 रूग्ण आहेत़ जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 71 हजार 267 झाली आह़े आरटीपीसीआर चाचण्यांता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 3.25 आह़े