प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने 40 हजाराचा आकडा पार केला आह़े रविवारी जिह्यात 567 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल़े तर 13 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा कडक निर्बंधानंतरही रुग्णसंख्येत घट होत नसल्याचेच आकडेवारीवरुन दिसून येत आह़े
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून †िमळालेल्या माहितीनुसार, रविवारी 3 हजार 291 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 353 तर ऍन्टिजेन चाचणीत 214 कोरोनाबाधित रुग्ण मिळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 40 हजार 200 इतकी झाली आह़े 13 मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े जिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 9, चिपळूण 1, खेड 1, दापोली 1, संगमेश्वर 1 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा एकूण मृतांची संख्या 1 हजार 356 झाली आह़े
तालुकानिहाय मृतांच्या संख्येनुसार रत्नागिरी 404, खेड 133, गुहागर 96, दापोली 118, चिपळूण 264, संगमेश्वर 162, लांजा 69, राजापूर 98, मंडणगड 12 मृत्यू झाले आहेत़ रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर हा 3.37 इतका असून पॉझिटिव्हीटी रेट 17.81 इतका आह़े