प्रतिनिधी/ रत्नागिरी
मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्या 19 जणांना घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 7 हजार 761 व प्रमाण 92.33 झाले आह़े जिह्यात कोरोनापासून बरे होण्याच्या प्रमाणात झपाटय़ाने होणारी वाढ आरोग्य यंत्रणेसह सामान्यांनाही दिलासा देणारी बाब आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी झालेल्या 655 चाचण्यांमध्ये 22 नवे कारोना रूग्ण आढळून आले. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 5 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 17 रूग्ण आढळून आल़े यामध्ये रत्नागिरी 5, संगमेश्वर 3, गुहागर 5, खेड 1, दापोली 4, चिपळूण 2, लांजा 2 अशी तालुकानिहाय संख्या असून रूग्णांची एकूण संख्या 8 हजार 405 झाली आह़े मंगळवारी एकही कोरोनाबाधित रूग्णाच्या मृत्यूची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
रूग्ण कमी होत असले तरीही धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा तसेच सॅनिटायझर, हॅड वॉशचा योग्य वापर करावा, असे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले आह़े