प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये रविवारी कोरोनामुळे दोघाजणांचा मृत्यू झाल़ा यामध्ये राजापूर तालुक्यातील 65 वर्षीय महिला तर चिपळूण येथील 74 वर्षीय पुरूषाचा समोवश आह़े तर नव्याने 25 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत़ मागील काही दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱयांची संख्या वाढताना दिसत आह़े त्यामुळे आता आरोग्य विभागासमोर कोरोना नियंत्रणाचे आव्हान उभे राहिले आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून †िमळालेल्या माहितीनुसार, जिह्यामध्ये तब्बल 294 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा त्यापैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 20 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 25 असे एकूण 25 कारोनाबाधित रूग्ण सापडले. रत्नागिरी तालुक्यात 6, खेड 1, चिपळूण 14, लांजा 3 व संगमेश्वर 1 अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 9 हजार 572 इतकी झाली आह़े तर मागील 24 तासात 9 रूग्ण कोरोनामुक्त झाल़े कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 9 हजार 93 वर पोहचली आह़े जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.99 इतके आह़े
मृतांच्या तालुकानिहाय आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 92, खेड 55, गुहागर 12, दापोली 37, चिपळूण 84, संगमेश्वर 35, लांजा 14, राजापूर 18 तर मंडणगडमध्ये 3 अशा एकूण 350 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े