प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्ह्यामध्ये सोमवारी 392 कोरानाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आल़ी कोराना रूग्णांमध्ये घट झालेली दिसून येत असली तरी टेस्टचे प्रमाण देखील 2 हजारावरून 1 हजार 466 करण्यात आले होत़े त्यामुळे रूग्णसंख्येमधील घट ही केवळ तात्पुरता दिलासा ठरण्याची शक्यता आह़े जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19 हजार 616 इतकी झाली आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी करण्यात आलेल्या आरटीपीसीआर टेस्टमध्ये 254 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये केवळ 138 से एकूण 392 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आल़ी यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 138 दापोली 77, खेड 19, गुहागर 10, चिपळूण 97, संगमेश्वर 29, लांजा 9 व राजापूर 13 असे रूग्ण आढळून आल़े मंडणगड तालुक्यात रुग्ण सापडलेला नाही. यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आता 19 हजार 616 इतकी झाली आह़े
मागील 24 तासात 88 रूग्ण बरे होवून घरी सोडण्यात आल़े यामुळे बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 164 इतकी आह़े तर जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 67.10 इतके आह़े तर जिह्यात नव्याने 18 मृत्यूंची नोंद करण्यात आल़ी यामध्ये मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 6, संगमेश्वर तालुक्यातील 1, लांजा 4, चिपळूण 2, राजापूर 4 व दापोलीतील 1 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा जिह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची तालुकानिहाय आकडेवारी नुसार रत्नागिरी 147, खेड 78 गुहागर 23, दापोली 62, चिपळूण 124, संगमेश्वर 87, लांजा 29, राजापूर 38, मंडणगड 6 जिह्यातील एकूण मृतांची संख्या 594 इतकी झाली आहे. मृत्यूदर 3.02 इतका आह़े