गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या मशिदींना भेटी
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर हे शांतताप्रिय शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहु महाराजांचा, फुले आंबेडकरांचा वारसा असणारे हे शहर आहे. नेहमीच जातीय सलोखा पाळत असतो. शाही मशिदीचे आणि राजघराण्याचे संबंध ऐतिहासिक आहेत. जुने ऋणानुबंधाचे संबंध आहेत. जिह्यात दोन्ही समाज एकत्र राहिला आहे. कुठेही असा प्रकार घडणार नाही. दोन्ही समाजातील लोकांनी सहकार्य केलेले आहे. त्याबद्दल हिंदू बाधवांचे, मुस्लिम बांधवांचे आभार राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त करत कोणाच्याही ट्विटकडे लक्ष देवू नका, असे आवाहन राज्यातील जनतेला त्यांनी केले.
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शहरातील सर्व मशिदींना भेट देवून पोलिसांच्याकडून आढावा घेतला. त्यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्यासह मशिदींचे ट्रस्टी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य मागच्या काही दिवसांपासून होत आहेत. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव साहब्sाांनी सर्व प्रशासनासह राज्यातील जनतेला शांततेचे आवाहन केलेल होते. रात्री उशीरापर्यंत मी स्वतः मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आम्ही सर्व राज्यातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या संपर्कात होतो. विभागस्तरावरील ग्रामीण भागातील अधिकाऱयांशी संपर्कात होतो. दोन्ही समाजात सलोखा ठेवण्याचे काम सुरु होते. आज मी सातारा, कराड, सांगली या भागामध्ये आहे. कुठेही चुकीचे प्रकार झाले नाहीत. मशिदीच्या समोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रकार जिह्यात कुठेही झाला नाही. पश्चिम महाराष्ट्रात कुठेही प्रकार घडलेला नाही. दोन्ही समाजातील लोकांशी मी वैयक्तिक बोललो आहे. लोकांनी सांगितले आहे आम्हाला शांतता हवी आहे, असे दोन्ही समाजाच्यावतीने सांगण्यात आले. अशीच शांतता राज्यात राहिल. ज्यांना कोणाला अशांतता निर्माण करायची आहे त्याला सर्वसामान्य जनतेतून प्रतिसाद मिळत नाही हे स्पष्ट झालेल आहे. येथून पुढेही मिळणार नाही. राज्यात शांतता राखण्याचे काम राज्य पोलिस दलाच्यावतीने करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
सातारा शहर हे शांतताप्रिय शहर
सातारा शहर हे शांतताप्रिय शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहु महाराजांचा, फुले आंबेडकरांचा वारसा असणारे हे शहर आहे. नेहमीच जातीय सलोखा आपण पाळत असतो. शाही मशिदीचे आणि राजघराण्याचे संबंध ऐतिहासिक आहेत. सातारच्या गादीचे जुने ऋणानुबंधाचे संबंध आहेत. जिह्यात दोन्ही समाज एकत्र राहिलो आहोत. कुठेही असा प्रकार घडणार नाही. दोन्ही समाजातील लोकांनी सहकार्य केलेले आहे. त्याबद्दल हिंदू बाधवांचे, मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त करतो, असे त्यांनी सांगत कोणाच्या तरी ट्विटकडे महत्व देत बसू नका. लोक शांतता पाळताहेत. जे लोकांच्या डोक्यात नाही ते घालण्याकडे लक्ष देवू नका. जातीय सलोखा लोक पाळताहेत असेच शांततेय वातावरण राज्यात राहू द्या, असेही त्यांनी सांगितले.
मशिदींबाहेर पोलिसांचा खडा पहारा, मनसे कार्यकर्त्यांवर वॉच
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांना केले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सातारा पोलिसांनी आज, बुधवारी शहरातील सर्वच मशिदींसमोर खडा पहारा ठेवला. तर दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर पोलिसांनी वॉच ठेवला असून, साध्या वेशातील पोलीस शहरात गस्त घालत आहेत. राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यभरात सर्वत्र मनसेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू असले तरी साताऱयात मात्र, याउलट परिस्थिती आहे. मनसे कार्यकर्त्यांनी तरुण भारतच्यावतीने घडवून आणलेली मंगळवारी सायंकाळी पोलिसांची परवानगी घेऊन राजवाडा परिसरातील हनुमान मंदिरात महाआरती केली. यावेळी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, बुधवारी सकाळपासून पोलिसांनी शहरातील मशिदींसमोर बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. याशिवाय मनसे कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करून आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची यादी तयार केली. प्रत्येक कार्यकर्त्यांवर लक्ष राहील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे. मशिदींसमोर शहरातील किती मंदिरे आहेत. याची यादीही पोलिसांनी तयार केली आहे. या मंदिर परिसरातही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांच्या मोबाइल लोकेशनवरही नजर
मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अचानक आंदोलन होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी काही मोजक्याच कार्यकर्त्यांच्या मोबाइल लोकेशनवर लक्ष ठेवले आहे. सातारा शहरात 368 पोलीस आणि अधिकारी तैनात आहेत. याशिवाय जिह्यातही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या असून, जे सुटीवर गेले होते. त्यांना तातडीने कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तरुण भारतच्या सलोखा परिषदेचे कौतुक
तरुण भारतच्यावतीने सातारा शहरासह जिह्यातील सर्व धर्मियांच्यातील मान्यवरांच्यासोबत सलोखा परिषद घेवून सलोखाच्या सौदहार्यचे वातावरण घडवून आणले. त्याबाबत तरुण भारतच्या या सलोखा परिषदेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.